Skip to main content

संपादकीय

संपादकीय

संवाद

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!
हे वर्ष नव्या शतकाचं पहिलं ‘टीन’ वर्ष आहे. याचा अर्थ एकविसावं शतक ‘टीन्स’ मध्ये प्रवेश करत वयात येतं आहे. आपला देश युवकांचा देश आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संपर्काच्या अनेक साधनांशी तरुणांची दोस्ती आहे. मात्र आपल्या समाजव्यस्थेला तरुणाईच्या भाव-भावनांची पुरेशी जाणीव नाही असं काहीसं आजचं वास्तव आहे. योग्य कारणासाठी, सामाजिक न्यायासाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लढणारे युवक ही देशाची खरी संपत्ती असते. असे युवक भारतात आहेत मात्र त्यांची संख्या कमी आहे आणि ती संख्या वाढवणं हेच आपल्या पुढचं आव्हान आहे.

संवाद

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!
सप्टेंबरच्या मध्यावर देशावरचं अस्मानी संकट बर्‍यापैकी दूर झालं आहे. देशात अनेक ठिकाणी यावर्षीची सरासरी पावसानं गाठली आहे. दुष्काळाच्या झळा कमी भासायला लागल्या आहेत. मुंबईचे पाणी पुरवठा करणारे तलाव भरून वहायला लागले आहेत. पुण्याची धरणंही भरत चालली आहेत. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणातली भकभक, रुक्षता जाऊन ओलीगार हिरवाई मनाला आल्हाद देणारी आहे, असं असलं तरी देशात काही ठिकाणी अजूनही दुष्काळाच्या ठसठसत्या वेदना आहेत. आपल्याला त्याचा विसर पडू नये.

Syndicate content