प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!
हे वर्ष नव्या शतकाचं पहिलं ‘टीन’ वर्ष आहे. याचा अर्थ एकविसावं शतक ‘टीन्स’ मध्ये प्रवेश करत वयात येतं आहे. आपला देश युवकांचा देश आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संपर्काच्या अनेक साधनांशी तरुणांची दोस्ती आहे. मात्र आपल्या समाजव्यस्थेला तरुणाईच्या भाव-भावनांची पुरेशी जाणीव नाही असं काहीसं आजचं वास्तव आहे. योग्य कारणासाठी, सामाजिक न्यायासाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लढणारे युवक ही देशाची खरी संपत्ती असते. असे युवक भारतात आहेत मात्र त्यांची संख्या कमी आहे आणि ती संख्या वाढवणं हेच आपल्या पुढचं आव्हान आहे.