``मिळून साऱ्याजणी' ला ऑगस्ट २००९ मध्ये २० वर्षं पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने तू तुझ्या `साऱ्याजणी'तल्या अनुभवांबद्दल लिहिशील?'' असं विद्याताइंर्नी विचारलं आणि वाटलं, बाप रे! २० वर्षं झाली मासिकाला? आणि मला काम सोडून दहा वर्षं?
वसीमला मी पहिल्यांदाच भेटत होते. तो घरी आला होता. त्याला विचारलं, `वसीम, आधी आपण चहा घ्यायचा का?' तो `हो' म्हणाला, त्याच्या चेहऱ्यावरून कळलं की ओळखीची ही सुरुवात त्याला मनापासून आवडली. चहा आवडणाऱ्या माणसांशी माझंही लगेच जमतं.