कथा

बेहुला

बेहुला कथेचा उर्वरित भाग
वसंत कलकत्त्याला जाऊन अँटिसिरम घेऊन आला. ज्याच्याकडे जाई तो डुलक्या देत म्हणे, `ओ, अँटिसिरम?' मग थोडंसं देऊन कर्तव्यभावनेनं म्हणे, `पण या औषधाची रिअॅक्शन असते हे लक्षात ठेवा.'
`माहीत आहे.'
`काय माहीत आहे?'

भूकपती

सूर्य डोक्यावर नाचत होता आणि भूक पोटात! रुक्ष वैराण आयुष्याचे ललाटनशीब घेऊन तो सैरभैर हिंडत होता. प्रखर उन्हाच्या स्पर्शाने त्याच्या भाकरीच्या साऱ्या जाणिवा करपून गेल्या होत्या आणि वाऱ्याच्या एखाद्या झोताने त्याच्या अंगावर फुंकर घालायचे ठरवले तरी वाऱ्याचे ओरखडे त्याला सहन होत नसत. सूर्य आग ओकू लागे आणि नेहमीप्रमाणे जीवाची लाही लाही ठरलेली. हिरव्या कोवळया भावनेला त्याच्या मनात थारा नाहीच.

'वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरे'

रेऊ कथा स्पर्धा : उर्वरित महाराष्ट्न् विभाग-द्वितीय क्रमांक

वाट चढून आले सोपानदेवाने आकाशात वर पाहिले, सूर्य आता डोक्यावर आला होता. त्याची स्वत:ची सावली त्याच्या पायाखाली आली होती. कुठेतरी बसावं नि फिरकीच्या तांब्यातलं पाणी घटाघटा प्यावं असं त्याला वाटलं. दाट सावलीचं एकही झाड त्याला जवळपास दिसेना. उघड्या बोडक्या घाटांतून रस्ता चढण्यात त्याचा बराच वेळ गेला होता. जरा लांबवर नजर टाकली, अंतरावर एक दाट सावलीचं झाड त्याला दिसलं. झपाझप पावलं टाकत तो तिथं पोहोचला. दाट पानांच्या गर्दीतून एखाद दुसरा सूर्यकिरण खाली येत होता. बाकी सावली झकास होती. ऐसपैस पाय पसरून तो बुंध्याशी विसावला.

वळीवाचा पाऊस

ठण् ठण् ठण् ठण्.... पहारेकऱ्याने घंटेचे चार टोले दिले, तेव्हा ललिता खोलीतून बाहेर आली. खोलीसमोरचं मोगऱ्याच्या सुवासानं घमघमणारं अंगण पार करून चालायचा व्यायाम करायसाठी खास तयार केलेल्या रस्त्याला लागली. इथं या रस्त्याला कोणी `वॉकिंग ट्न्ॅक' म्हणत नव्हतं की त्याच्या सभोवती असलेल्या बागेला `जॉगर्स पार्क' म्हणत नव्हतं. पाच फेऱ्या म्हणजे दोन किलोमीटर चालणं. रोज पाच-सात किलोमीटर चालून वजनाचे किलो घटवायला अनेक जण इथं येऊन राहतात. ती सुद्धा त्याच उद्देशानं आलेली; पण तिला वजन कमी करायचं होतं ते तिच्या मुलीचं. स्वत:चं नव्हे. तरीही ही भल्या पहाटेची वेळ तिच्या अत्यंत आवडीची होती. साधारण साडेचार पावणेपाचला इथं लोकांच्या हालचाली सुरू होत. तत्पूर्वी असं रमतगमत फिरणं हाच तिथल्या रटाळ आणि निरस जीवनक्रमातला मोठा विरंगुळा होता. दिवसभर भाजून काढणारा उन्हाचा रखरखाट आणि उबवून टाकणाऱ्या घामट रात्रींच्यामध्ये पहाटेची ही वेळच काय ती थंडगार आणि प्रसन्न वाटायची तिला. त्यामुळे दिवसभर जयाच्या ट्नीटमेंटमागे वणवणून कितीही थकली असली, रात्रीचा पहिला प्रहर रमणिकच्या बेधुंद स्पर्शांना आठवत, तळमळत काढलेला असला तरीही पहाटेचे हे निसर्गसान्निध्यातले फिरणे तिला सोडावेसे वाटत नसे. फिरायचा मार्गही तसा आपलं वैशिष्ट्य राखून होता. त्यामुळे रस्त्याला लागल्यावर लगेच तिची नजर सरावाने समोर वळली.

मला वाटलं विचारावं...

कालच सुमिताच्या लग्नातून परत आले अजून त्या हरपर्सेींशी मधूनच बाहेर पडले नाही आहे, डोळयांसमोर लग्नच फिरत आहे.

कलंकभोग....

'देवो% माय% भाकर, लेकराबाराले भाकरतुकडा.' हा हेल काढून आलेला आवाज सखूच्या कानी पडला. तशी सखू बाहेर आली.

मूलभूत मानवाधिकार व भिका मेंढपाळ

नवागड हे एक लहानसं संस्थान किंवा मोठं जमीनदारीचं गाव. या गावाच्या सीमेलगत बस-रस्त्यापाशी लहानशी एक वस्ती. नवागडच्या जमीनदाराला `राजा' ही पदवी दिली जात असे. भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी राजेसाहेबांचं वय होतं एक वर्षाचं.

कथा आणि व्यथा- त्या दोघींची

परीकथा नसली तरी ही कथा तर नक्कीच आहे, त्या दोघींची, त्यांच्या असाध्य दुखण्याची, दुर्दैवाची, नातलगांच्या उपेक्षेची आणि तरीही त्या दोघींच्या असीम धैर्याची. स्वत:वरच्या डॉक्टरवरच्या अचल, अढळ विश्वासाची कथा आहे.

सांज सकाळपुरती माय

वैशाखातल्या कडक उन्हाच्या भडक्यात मातीचं ऊर तडकून जात होतं, अशा वेळी साधन कांदोरीची माय देवी जटेश्वरी मरून गेली.