Skip to main content
कथा

बारा रामांचं देऊळ

‘होऽऽ आज मालीकडे गेले होते तुमच्या... भाचीकडे तुमच्या. मधल्या सुट्टीत! खूप दिवसांत झालं नव्हतं जायला. ती जाऊन आले आज.’’
छान आहे की! झालंय काय तिच्या तब्बेतीला?
ती, मुलं, सगळी छान आहेत. तिची तर तब्बेत नको इतकी छान दिसली.
नको इतकी म्हणजे नेहमीचंच तिचं.
अहो दुसरं काय? सहावा-सातवा तरी महिना असेल.
मी आपलं पाह्यलं तिच्याकडे अन् थक्कच झाले. म्हटलं, ‘माले, अगं लग्नाला सात वर्षं नाही झाली तर हे पाचवं मूल तुझं. काय म्हणावं तुला!’

गहाणवट

जगात वावरताना सतत समोर येणारं वास्तव म्हणजे तुम्ही बेघरच असता. एक शांतपणे झोपण्याइतकी जागा मिळवण्यासाठी बर्‍याच लढाया कराव्या लागतात. कोणत्या तरी गोष्टीत लहानपणी वाचलं होतं; प्रश्न केलेला त्या ऊर फुटेस्तोवर धावणार्‍या माणसाला, शेवटी किती जागा लागली पुरायला म्हणून. पण न मरता जगायचं तर तेवढीही जागा मिळवायला फारच वेळा जिवावर बेततं. अर्थात मुलगी असूनही मला गर्भाशयातली जागा नाकारली गेली नाही हे भाग्यच म्हणायचं. सोनोग्राफी आणि गर्भलिंगचिकित्सा यांचा शोध माझ्या जन्माच्या वेळेस निपाणीपर्यंत पोहोचला नव्हता म्हणून असेल. पण आईनं भावाच्या पाठीवर मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता.

श्राद्ध

कमल देसाई
जन्म ः १०/११/१९२८
मृत्यू ः १७/७/२०११

खरं म्हणजे चार वर्षं झालीत तिला जाऊन... पूर्वी असं कधी झालं नव्हतं! पण... गेले आठ दिवस पुनःपुन्हा तेच तेच स्वप्न पडतंय... काही कळेनासं झालंय मला!

तिचे जगणं

शारदा एकदम दचकून जागी झाली. आपण कुठे आहोत आणि हा कसला आवाज आहे असा तिचा गोंधळ क्षणभरच टिकला. पहाटे पाणी आल्या आल्या लगेच भरलं तरच मिळतं, नाहीतर त्याचा काही भरोसा नसतो, म्हणून रात्री झोपताना नळ चालू ठेवून झोपायची तिने स्वतःला सवय लावून घेतली आहे. तरीही तिचे रोजचे हे दचकून जागे होणे मात्र काही संपत नाही.

खूप अंधार होता

‘‘जागी झालीयस ना?’’ ह्यांचे शब्द ऐकले आणि मी त्या भयानक स्वप्नातून बाहेर आले. खरंच किती विचित्र, अंतहीन स्वप्न होतं ते. एका अर्धवट बांधलेल्या प्रचंड इमारतीत मी कोणाला तरी शोधत होते. धडपडत इकडून तिकडे धावत होते. त्याच वेळेस एका अनामिक भीतीनं माझं उर धपापतही होतं.
जागी झाल्यावर मी सुटकेचा दीर्घ श्वास सोडला. आता मी बांबूच्या सांगाड्यावर कोणाला शोधत नव्हते. अंथरूणावर होते. स्वतःच्या घरात होते.
‘‘इकडं येतीयस ना. चहा घ्यायला?’’- हे.
‘‘हो. आलेच एका मिनिटात.’’

ही वाट एकटीची!

‘‘मावशी, पोळ्या झाल्या बरं का! कुकर भरून ठेवलाय. ओटापण स्वच्छ केलाय. जाते मी.’’
स्वयंपाकाच्या बाई गेल्यावर अनघाताईंनी दार लावले आणि हताशपणे त्या खालीच बसल्या. आत्ता कुठे दहा वाजत आले होते. सकाळी नऊलाच लेक आणि जावई ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडले होते, ते संध्याकाळी सातशिवाय परतणार नव्हते. दिवसभर आता त्या आणि घड्याळाची टिकटिक! जन्मठेपेच्या कैद्याला एकांतवासाच्या कोठडीची शिक्षा दिल्यासारखी त्यांची अवस्था होती.

कथा : स्त्री

सबंध घरात तिला ‘मामी’ म्हणत. खरे म्हणजे तिला मामी का म्हणत, कोण जाणे! वास्तविक ती मुलांची होती मावशी. मुलांच्या आईची होती बहीण आणि मुलांच्या वडलांची मेहुणी! तिला सर्वांनी मावशी म्हणायला हवे होते, किंवा अक्का, माई असे तरी म्हणायला हवे होते. पण मुलांची आईसुद्धा तिला ‘मामी’ म्हणे म्हणून मग सर्वच तिला ‘मामी’ म्हणत. नात्यातली माणसे, गावातली माणसे-सारीच म्हणत, ‘काय, मामी आहेत का घरात?’
‘मामी’ म्हटले की, आपल्यासमोर जरा थोराड देहाचीच बाई उभी राहते. पण ही मामी अगदी एवढीशी होती. एखाद्या बाहुलीसारखी होती. आपल्याच हाताची करंगळी समोर धरावी आणि तिला म्हणावे, ‘मामी!’

तिचं वेगळं जग

तिला ‘पुरुषा’ची गरज वाटत नाही! प्रामाणिकपणे वाटत नाही. ‘‘प्रत्येक वेलीला वृक्षाच्या आधाराची गरज असते’ ही हूल कुणी उठवली? शाळेतल्या ङ्गळ्यावर हे लिहायला ठीक आहे. मी तसं अजिबात वाटून घेत नाही. ‘लग्न’ ही माझ्या दृष्टीने एक अनावश्यक बाब आहे. मी चित्रकार आहे. रंग आणि रेषांच्या जगात ‘व्यावसायिक’ म्हणून मस्त मजेत आहे. तुमची ‘व्यवस्था’ आणि विचारसरणी तुम्ही प्रत्येक (बाई) माणसावर काय म्हणून लादता? ठकू आणि काकूला तर माझ्या स्टुडिओत प्रवेशच नाही. चहाड्या, जगाच्या भानगडी, उचापती मला नकोच आहेत...’’ तीच हे म्हणत होती.

गोष्ट तशी साधी

हे ईश्वरा, तू माझ्या मनात असे समाजाला अमान्य असे विचार का पेरतोस? मी काहीबाही वागले तर तो मला सगळ्या वाईट-साईट शिव्या देईल. मी देऊ त्या शिव्या. देवू? देवू? नको ना. मग असे विचार तू का रुजवतोस? अर्थात असं समजणं म्हणजे तू काहीतरी करतोस यावर विश्वास ठेवणंच आहे. त्या दिदींनी काय सांगितलं आहे? लक्षात आहे ना? डोळे बंद करून थोडावेळ वज्रासनात बसायचं. कोणताही प्रश्न नाही, कोणतेही उत्तर नाही. मग पद्मासनात बसायचं. डोळे बंदच. डोळे बंद म्हणजे सगळं शांत आणि डोळे उघडे म्हणजे गोंधळ? वा रे वा! मी साध्वी व्हायला पाहिजे, सर्व आयुष्य धार्मिक कार्यात घालवलं पाहिजे.

मेळावा

"कावं कमले काऊन थो गरमसेवक आला व्हता वं आपल्या वाड्यात.''
"थो की नई आल्ता माय कायी गट-गट म्हणत व्हता थो.''
"काय म्हणत व्हता थो?''
"मले बी काय समजते थे, त्या सोभी की संगे आल्ता थो.''

Syndicate content