Skip to main content
लेख

स्त्रीची सूक्ष्म भावांदोलने टिपणारी कथा

‘‘मराठी कथेचा जो उत्क्रांतीमार्ग आहे त्याच्या एकेका टप्प्यावर महत्त्वाच्या स्त्रीकथाकार उभ्या आहेत. त्यांपैकी काहीजणींच्या कथा आजच्या लेखक-वाचकांसमोर ठेवणं, त्यावर विचार करणं हे आजच्या काळातही प्रस्तुत ठरेल, असं वाटतं. स्त्रीकथाकारांना तत्कालीन स्त्रीप्रश्नांची जाणीव कसकशी होत गेली, हे पाहणं चांगल्या अर्थानं मनोरंजक आणि उद्बोधक ठरेल असं वाटलं.’’ त्या दृष्टीने ‘मिळून सार्‍याजणी’ मधून मार्च २०११ पासून एकेका स्त्रीकथाकाराची कथा पुनर्मुद्रित करत आहोत. कथांची निवड व त्यावर टिपण लिहिताहेत डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी.

वाचणारे लिहितात

Posted in

प्रिय गीतालीताई, विद्याताई,
‘मिळून सार्‍याजणी’चा दीपावली विशेषांक वाचतेय. संजीवनी कुलकर्णी यांचा माधुरी पुरंदरेंचा परिचय करून देणारा लेख वाचला. जगण्यासाठी वेगळी वाट पत्करून जगणं आणि ते एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर सर्जक, कृतीशील बनवणं आणि सामाजिक भानही जागतं ठेवणं कसं शक्य आहे, ते दाखवून देणारा हा लेख आवडला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनासंदर्भात आता जबाबदारी आपलीच याची जाणीव करून देणारा विद्याताईंच्या लेखातला मुद्दा महत्त्वाचा आहे. इतर लेखही वाचनीय वाटत आहेत. अजून वाचायचे आहेत.

आपल्या वाचनालयात

नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध
मुक्ता मनोहर
मनोविकास प्रकाशन
किंमत - ३०० रु.

‘पुण्याचं पाणी’ आणि लवासा

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात मी खूप प्रवास केला. नाशिकचं पुस्तक प्रकाशन, कोल्हापूरचा स्मृतिदिन, बेळगावचं ‘सार्‍याजणी’चं दिवाळी अंक प्रकाशन, इंदोरचा महिला मेळावा आणि बिहारभेट अशा वेगवेगळ्या कारणांनी, वेगळं गाव, वेगळा कार्यक्रम, वेगळी माणसं, खूप गाठीभेटी असं काय काय घडलं. प्रेम करणारी, मनापासून बोलणारी, कामं करणारी अनेक माणसं भेटली. त्यात थोडं काही भरीव/पोकळ स्वाभाविकपणे होतंच. तरीपण प्रेमाचं आणि चांगुलपणाचं पारडंच जड होतं. त्यामुळेच शरीर दमलं तरी मनाला अतिशय टवटवी आली! जरा दम खाल्ल्यावर थकवा गेला पण मन मात्र नवं काही बघण्यासाठी पुन्हा टवटवीत झालं.

पुरुषाच्या नजरेतून स्त्रीमुक्ती

पुरुषाला स्त्रीमुक्ती दिसते कशी? हा प्रश्न गेली तीसएक वर्षं माझ्या जाणीव-नेणीवेच्या पातळीवर मनात आहे. जवळजवळ अनुत्तरितच आहे! स्त्री-पुरुष दोघंही म्हटलं तर एकाच ‘मानव’ या जीववैशिष्ट्याचे नमुने! पण त्यांच्यात देहधर्मापासून ते सांस्कृतिक, मानसिक जडण घडणीपर्यंत असं काही वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे, की ते दोन निरनिराळ्या ग्रहांवरच्या जीवसृष्टीतून आलेले प्रतिनिधी वाटू लागतात.

कॉम्रेड रा. प. नेने स्मृती आणि विचारसंपदा

पुण्याच्या सार्वजनिक जीवनात रा. प. नेने यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण होते. २३ मार्च २०१० रोजी त्यांचे निधन झाले. नेने यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारा आणि त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन संग्रहित करणारा स्मृतिग्रंथ त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रकाशित करण्यात आला. ठाम वैचारिक निष्ठा आणि विवेकवादी जीवनदृष्टी असलेल्या सक्रिय कार्यकर्त्याला साजेल अशीच ही ग्रंथरुपी आदरांजली आहे.

माणुसकीच्या आठवणी

माझं वय आता नव्वद आहे. माझी मी आता स्वतंत्र मजेत राहते. माझ्यापुरती रोजची कामं स्वतः करू शकते. त्यामुळे फारसं अडत नाही. काही जास्तीची मदत लागली तर मुलं, नातवंडं असतातच हाक मारायला. सकाळची नित्यकर्मं आटोपली की दुपारी सावकाश मी पेपर वाचते. रोजचे रोज वाचून संपतातच असं नाही, कारण दृष्टी आता कमी काम देते. पण माझ्यापाशी वेळच वेळ आहे. मला कुठे कशाची घाई आहे? पण पेपर उघडला की ज्या बातम्या वाचाव्या लागतात, त्या अस्वस्थ करणार्‍या असतात. चोरी-दरोडे, खून-बलात्कार, अपघात आत्महत्या, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार यांच्या बातम्यांनी पानंच्या पानं भरलेली! माझ्यासारख्या जुन्या पिढीच्या बाईला हे सगळं कळेनासंच होतं.

रेऊ कथास्पर्धा - परीक्षकांचं मनोगत

’रेऊ कथास्पर्धे’तील कथांचे परीक्षण करण्याच्या निमित्ताने मराठी भाषेच्या परिघातील नवनवे कथाकार कोणते विषय हाताळतात, समकालीन जीवनवास्तवाचा ते कसा विचार करतात, सामाजिक-राजकीय भान त्यांच्या लेखनातून कसे प्रकटते, समस्यांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे कथामाध्यमाची जाण ते कशाप्रकारे दाखवतात- हे सारं समजून घेण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी प्रथम ‘मिळून सार्‍याजणी’चे आभार मानते.

Syndicate content