``अगं ! जरा मला शाळा सुटल्यावर भेट. काम आहे.'' पाटील सर मला बोलून गेले आणि त्या क्षणापासून माझं मन हेलकावे खायला लागलंय. ह्यांचं काय काम असेल माझ्याकडे ? काय सांगणार असतील ? काय विचारणार असतील ?.... आणि शाळा सुटल्यावरच का ?