निर्मितीच्या नव्या वाटेवर अमृता सुभाष

अमृता बिझी आहे-प्रचंड बिझी ! आमची गाठभेट ठरण्याचा मुळीच योग दिसत नाही आहे. फोनवरदेखील चुकामूक होत आहे. ती मुंबईत आहे; मी पुण्यात. तेवढ्यात माझं एक रेकॉर्डिंग मुंबईत ठरतं आणि अमृताच्या शूटिंगच्या लंच ब्रेकमध्ये भेटायचं पक्कं होतं. पण माझं गाण्याचं रेकॉर्र्डिंंग दुपार उलटून गेली तरी सुरूच राहतं. आता प्रत्यक्ष भेट फारच मुश्कील! फोनवर सरळ गप्पा माराव्यात का? का तशी मुलाखत रंगणार नाही? पण सगळया शंकांना मागे सारून अखेरीस आम्ही फोनवरच बोलतो. अमृताच्या पहिल्या उत्तराक्षणीच साऱ्या शंका पळ काढतात. आमचा मनमुराद संवाद रंगतो. निमित्त आहे `आज्जी' या अमृतानंच दिग्दर्शित केलेल्या नवीन लघुपटाचं आणि खरं निमित्त आहे, या बुद्धिमान संवेदनशील मुलीला बोलतं करायचं- वेगवेगळया विषयांवर, मुद्द्यांवर.
आशुतोष: अभिनंदन अमृता! तुझ्या `आज्जी'ची सगळीकडे जोरदार हवा आहे.
चांगले अभिप्राय कानावर पडताहेत, सगळयांना उत्सुकता वाटते आहे आणि `मिळून साऱ्याजणी'च्या वाचकवर्गाला तर आज्जीचं नक्कीच खास अप्रूप आहे. मला सांग, मुलगी-आई-आज्जी हे नातं मुलगा-वडील-आजोबा या नात्याच्या लिंकपेक्षा वेगळं असतं का? खास असतं का?
अमृता: (एक क्षण थांबत) वेगळं विचारलंस तू! आणि हो, मला नक्कीच वेगळं वाटतं आज्जी-नातीचं नातं. शेवटी तीन स्त्रिया आणि तीन पुरुष हे वेगवेगळेच असतात किंवा तीन भाऊ आणि तीन बहिणी यांची नात्यातली समीकरणं ही नक्कीच निराळी असतात.
माझी आजी माझी वेणी तिच्या हातानं करायची. मधुमालतीची फुलं ओवायची किंवा माझ्या आज्जीचं फाऊंटनपेन; आजीची नऊवारी साडी... हे सगळं मुलगी आणि आजी यामधे आहे. अर्थात मी म्हणेन की पुरुषांची `इंटिमेट' व्हायची पद्धत वेगळी असणार. पाडगावकरांनी जसं `आजोबा' कवितेत नातं मांडलंय किंवा `लंपन'- प्रकाश नारायण संतांचा...
त्यामुळे मला वाटतं आपण असं जनरलाईज करू शकत नाही आणि करू नये. प्रत्येक माणसाबरोबर त्याचं आयुष्य असतं आणि त्याचे त्याचे अनुभव असतात. कुसुमाग्रज म्हणतात -
`एक माणूस जातो - एक जमीन जाते; एक आभाळ जातं' त्यामुळे ही सगळीच नाती खास असतात. पुन्हा सेन्सिटिव्हिटीचा मुद्दा आहे. एखादा माणूस जास्त सेन्सिटिव्ह असेल; एखादा कमी. नातं त्यावरही ठरणार!
आशुतोष : वा! छान! साहित्यानं तुझ्यावर केलेले संस्कार तुझ्या वाक्यावाक्यातून दिसून येतात. मला एक विचारावंसं वाटतंय; तू उत्तम अभिनेत्री आहेस. तुझ्या गाण्यांचा अल्बमही आता प्रसिद्ध झाला आहे तर `आज्जी'च्या निमित्तानं तू दिग्दर्शिका, लेखिका, सह-निर्माता असे वेगवेगळे रोल्स करते आहेत. हे सगळं तू क्रमाक्रमानं ठरवून केलंस का तुझी रसिकताच तुला तसं सांगत गेली?
अमृता : बरोबर बोललास - माझं मन मला सांगत गेलं; माझी रसिकता मला सांगत गेली. पण कधीकधी वाटतं की अंगातली कला वाढवण्यासाठी पोषक वातावरण मला सतत मिळालं म्हणून हे जमलं. मी खेडेगावात बघते ना - बायकांमध्ये किती गुण असतात! कुणी गातात, कुणी चांगलं नाचतात, कुणी उत्तम नकला करतात. पण ते सगळं दुर्दैवानं तिथवरच राहतं.
माझं मनाच्या जडण-घडणीचं श्रेय मी माझ्या पालकांना, सगळया फिल्म मेकर्सना, संदेशला, माझ्या टीम मेंबर्सना, माझ्या सासरच्या मंडळींना देईन. म्हणजे रात्री दहाला घरी येऊन स्वयंपाक करावा वगैरे जाऊच दे पण मी मुंबईमध्ये घर थाटलं आहे, तर कमी वेळ सासरच्या लोकांना (जे पुण्यात असतात) देता येईल हे समजून घेणारी माणसं आहेत आणि म्हणून माझी एनर्जी खूप वाचते. ती वाचलेली शक्ती मी माझ्या कामात वापरू शकते. बोलण्याच्या ओघात अमृता आठवणींमध्ये पुन्हा हरवली. तिच्या माणसांचा विषय निघाल्यावर तिला आजी आठवणं साहजिकच होतं.
अमृता : आता `आजी'मध्ये एक सीन आहे. म्हणजे तो खराच माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग आहे. शारवीनं (जिनं माझी छोट्या वयातली भूमिका केली आहे) आज्जीला विचारलं, ``आई-बाबांना नंगू व्हावंसं वाटतं का गं?''
आता १९२३ साली जन्मलेली माझी आजी ते ऐकून हसायला लागली होती. ती मला रागावली नाही. `गप बस' असं म्हणाली नाही. आणि त्यामुळे पुढे माझ्या आयुष्यात ीर्शुीरश्र ळपषेीारींळेप फार गोड पद्धतीनं आली.
आशुतोष : पण आज तर सगळयाच माहितीचा विस्फोट झाल्यासारखा दिसतो आहे. आताच्या मुलांना जरा जास्तच माहिती असते, असं मला वाटतं आणि तरी उलट लंपटपणा, लोचट नजरा यात काही फरक पडलेला नाही. तुला काय वाटतं?
अमृता : खरं आहे. सध्या मी रसेलचं `ढहश लेपिंर्शीीीं ेष हरिळिपशीी' हे पुस्तक वाचते आहे. करूणा गोखले यांनी त्याचा सुंदर अनुवाद केला आहे. दु:ख म्हणजे काय; स्पर्धा म्हणजे काय असे अनेक विषय त्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं, की माणसाला सगळं मिळत गेलं की अप्रूपच जातं! आणि अप्रूप ही भावना कधी हरवू नये.
मी सध्याच्या मुलांविषयी नैतिक-अनैतिक असं म्हणणार नाही. पण एक नक्की की शारीरिक संबंधांचं अप्रूप कमी होत आहे.
आणि अप्रूप खाण्याचं असू शकतं, नवीन पदार्थ करून बघण्यामध्ये आहे अप्रूप. लग्न हेच खरं अप्रूप असं मी म्हणत नाही पण कुठल्याही स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष किंवा स्त्री-पुरुष नात्यात अप्रूप नसेल तर मजा नाही. ते या पिढीतल्या लहान मुलांना मिळावं असं मला नक्की वाटतं.
तुला सांगते, `आजी'चं शूटिंग ग्रामीण भागात होतं. तेव्हा आमचे सगळे बालकलाकार मजा करायचे. गिरीश कुलकर्णीची मुलगी शारवी, रेणुका दफ्तरदारची मुलगी, ध्रुव हे सगळे शेतात फिरले, पारंब्यांवर खेळले, जांभळाच्या झाडाखाली बसले. हे अप्रूप फार मोलाचं आहे. ध्रुवनं तर नंतर पहिली फिल्म लिहिली आहे!
अमृताच्या आवाजात मुलांविषयी मार्दव होतं, माया होती. कदाचित तिच्या बालपणीच्या आठवणींची माळ ती तिच्या मनात तेव्हा उलगडत होती. मी हसून सांगितलं की `अप्रूप' या विषयावर तू नवा लेख लिही! अमृतान लगोलग होकार दिला. मग मला तिला वेगळं विचारावंसं वाटलं.
आशुतोष : अमृता, मला आठवतंय, सुदर्शन रंगमंचाच्या पायऱ्यांवर आपण दोन-तीन वर्षांपूर्वी बसलो होतो आणि मी माझी नवी चाल तुला ऐकवली. तू दाद दिलीस आणि पटकन स्वत:शीच बोलावं तसं म्हणालीस, ``चाल लागते तेव्हा काय मजा येते ना!'' गंमत म्हणजे हे वाक्य किंवा तशी भावना मी संगीत क्षेत्रातल्या लोकांकडूनही पिचतच ऐकली आहे! एकीकडे ही तुझी `स्पांॅटॅनिटी', तुझी संवेदनशीलता आणि दुसरीकडे अतिशय निर्र्घृण अशी मीडियामधली स्पर्धा - तू व्यवहाराच्या धबडग्यात हे कसं सांभाळतेस?
अमृता : जाणीवपूर्वक अनेक गोष्टी मी त्यासाठी करते! मी शांताबाइंर्चं वाचलं होतं की गीतकार हा रोल त्यांनी कसा कवयित्रीइतकाच साजरा केला. खरं ते कमर्शियल काम, पण त्यांनी त्यात मजा घेतली.
ते माझ्या डोक्यात पक्कं बसलं आहे, आता `अवघाचि संसार'विषयी लोक उलटसुलट विचारतात. पण माझा `अॅक्ट्न्ेस' म्हणून त्या सिरीयलचा असा फायदा झाला की क्रॅमेरा हे माझं दुसरं घरच बनलं!
आणि हा दृष्टिकोन-मजा घेण्याचा-उपजत नव्हता. पण मी नेहमी म्हणत असते की आयुष्य हे माझ्याशी सहृदयतेने वागत आलं आहे. मी सारखं हे म्हणत असते.
आशुतोष : वा! अतिशय पॉझिटिव्ह वाक्य आहे हे! नाहीतर माणसं फार कुरकूर करताना दिसतात.
अमृता : तेंडुलकरांसारख्या माणसाकडून मला खूप मिळालं.
हारूकी मुराकामी (कर्रीीज्ञळ र्चीीरज्ञराळ) सारखा उत्तम लेखक त्यांनी माझ्या पुढ्यात दिला! त्याच्या एका कथेनं तर मला स्पिरीच्युअल म्हणावा असाच अनुभव आला. हा लेखक आत्मा स्वच्छ करतो! ए, सध्या ना मी त्याची कादंबरी वाचते आहे `थहरीं ख ींरश्रज्ञ रर्लेीीं ुहशप ख ींरश्रज्ञ रर्लेीीं र्ीीपपळपस' नावाची. तूही वाच. तो लेखक श्रेपस वळीींरपलश र्ीीपपशी आहे आणि ही कादंबरी तर ग्रेटच आहे.
तेवढ्यात मागून शूटचा आवाज येतो. ब्रेक संपला आहे. गॅप घ्यावी लागणार. वीस मिनिटांनी पुन्हा बोलायचं ठरतं. मला वाटतं, की अमृता सुभाष ही तरुण मुलगीदेखील श्रेपस वळीींरपलश र्ीीपपशी आहे आणि तिच्या जगण्याची जिती-जागती कादंबरी ती वेगात, उर्मीत लिहित आहे.
वीस मिनिटांनी पुन्हा आमचं बोलणं सुरू होतं. मी तिला सोनाली कुलकर्णी- जी तिची वहिनी आहे, संदेश कुलकर्णी - जो नवरा आहे, सत्यदेव दुबे-ज्यांच्या तालमीत ती तयार झाली त्यांच्याविषयी विचारायचं ठरवतो.
आशुतोष : हाय! आता मी तुला `कॉफी विथ करन'सारखं विचारणार आहे. मी एक शब्द उच्चारणार, तू उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यायची.
अमृता : (हसून) ओके.
आशुतोष : संदेश.
अमृता : (दीर्घ श्वास घेऊन आनंदात सोडत) प्रेम!
आशुतोष : दुबेजी
अमृता : आदर किंवा माझ्या प्रत्येक `चंेजिंग पॉइंर्ट'ला ते न बोलावता आपसूक कळल्यागत असतात - ही डेस्टिनी!
आशुतोष : सोनाली.
अमृता : उत्तम अभिनेत्री - नाही, नाही- पहिलं म्हणजे सुंदर डोळे!
आशुतोष : ज्योतीताई - तुझी आई.
अमृता : आई? आई- सर्व काही !
आशुतोष : आज्जी.
अमृता : मधुमालतीचा गोफ!
आशुतोष : पिक्चर.
अमृता : फिल्म मेकर.
आशुतोष : पुस्तक.
अमृता : लेखिका. म्हणजे मला पुस्तकाशी आता वाचकापेक्षा लेखिका म्हणून जोडून घ्यायला आवडेल. तसंच पिक्चरशी फिल्म मेकर म्हणून.
आशुतोष : फार कमी फिल्ममेकर्स हे गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक असे असतात. उदा. विशाल भारद्वाज. अर्थात, चांगल्या दिग्दर्शकाला चांगला संगीताचा कान असतोच.
अमृता : जसे जब्बार पटेल. `उंबरठा' ते `मुक्ता' कुठलाही त्यांचा चित्रपट घ्या- `जैत रे जैत' बघ, काय गाणी आहेत. सिनेमाचं संगीत हे `एडिटिंग' ठरवतं. टायमिंग हे खऱ्या गाण्यातही महत्त्वाचं असतं आणि एडिटिंग मध्येही. कुठे मिंड घ्यायची, कुठे ठहराव असेल हे दोन्हीमध्ये सांभाळावं लागतं.
आशुतोष : खरंय, जसं सुभाष घइंर्च्या चित्रपटाचं संगीत कुणाचंही असलं तरी गाणं हे अखेरीस सुभाष घइंर्चं असतं. पण गायिका म्हणून स्वतंत्र करिअर सांभाळणं हे अजून वेगळं वाटतं मला.
अमृता : कॉलेजमध्ये असताना मी समीर दुबळयांकडे गाणं शिकले. सध्या वर्षा भावे यांच्याकडे शिकत होते. पण रसेल म्हणतो की एक मेन प्रोफेशन असावं. घोड्यापुढे गाडी ठेऊ नये. पूर्वी मलाही तसंच वाटायचं. की मी अभिनेत्री आहे आणि मग गातेही चांगलं. पण आता मला गायिकेचं गाणं म्हणून छान म्हणवून घ्यावंसं वाटतं. जसे फिल्म मेकिंगमध्ये गुलजार आहेत- कविता, पटकथा, दिग्दर्शन सगळं अफाट. `इजाजत'मधलं अनुराधा पटेलचं पात्र त्यांनाच सुचू शकतं.
आशुतोष : तू नक्की तिथवर पोचशील याची मला खात्री आहे. `आज्जी'मधून तशी सुरुवातही केलीच आहेस. मला एक सांग, सेटवर तुझी आई तुझ्या आज्जीचा रोल करत होती. तेव्हा आई समोर आली की चुका व्हायच्या? टेंशन यायचं?
अमृता : हो, सुरुवातीला आई आली की चुका व्हायच्या पण आता आमचं नातं अशा टप्प्यावर आलं आहे की खरोखर आम्ही मैत्रिणीसारख्या झालो आहोत. एकदा तर आम्ही लहान मुलांसाठीची `जॉय ट्न्ेन' असते त्यात दोघी बसलो आणि `आता रहिमतपूर येणार' वगैरे बोलत बसलो. मला वाटतं, आता आम्ही एकमेकींचं मूलपण सांभाळून घेऊ शकतो. मग मी नंतर सरळ म्हणू लागले, ``चल गं आई, चल पटकन हा शॉट करू या!''
आशुतोष : तुझ्या-आईच्या नात्याविषयी तुला पुष्कळदा विचारलं जात असेल. कारण आई देखील मोठी अभिनेत्री; इतकी वर्षे कार्यरत. पण मला सांग, तुझे बाबा आणि तुझा भाऊ यांचं तुझं कसं नातं आहे?
अमृता : माझे बाबा हे अतिशय शांत गृहस्थ आहेत. माझ्यात जी चिकाटी आहे ती सगळी माझ्या बाबांची आहे. किंवा कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायची माझी सवय ही बाबांमुळेच आहे. बाबा गणित शिकवताना धड्याच्या पहिल्या पानापासून शिकवायचे. तेव्हा आम्ही म्हणायचो की हे फक्त सांगा/सोडवा. पण आज त्याचं महत्त्व कळतं.
आशुतोष : आणि भाऊ? माझ्या गाण्याची सगळयात कडक समीक्षा आणि सगळयात सजग दाद माझा भाऊ देतो. तुझ्या घरी कसं चित्र आहे?
अमृता : माझा भाऊ जयसिंह अमेरिकेत इंजिनिअर आहे. त्याचे डोळे जे टिपतात ते अफाटच असतं. `ती फुलराणी'च्या वेळी तो कुठल्यातरी प्रयोगाला मधेच यायचा आणि बरोब्बर टिपायचा की आज मी काय बदल केले प्रयोगात ते.
तो कठोर नाही पण सडेतोड समीक्षक आहे. आता तिकडे अमेरिकेत तो आणि त्याची बायको दोघेही `आज्जी' तिथल्या फेस्टिव्हलमध्ये पोचावा म्हणून धडपड करत आहेत.
मला जाणवलं की, अमृता ही लेाश्रिशींश षराळश्रू ारप म्हणू तशी आहे आणि तरीही निर्भय, स्वावलंबी आहे. जगण्याचा पाया चांगल्या कुटुंबावर रचलेला असला, की पुढची आव्हानं सोपी वाटतात. जिंकलं तरी डोक्यात हवा चढत नाही आणि हरलं तरी समजूतदार मनं पाठीशी अबोलपणे उभी असतात. शेवटाला मी तिला विचारलं-
आशुतोष : शेवटचं. `मिळून साऱ्याजणी'च्या वाचकांना तू काय सांगशील?
अमृता : हा जो मुक्त संवाद जसा आज आपल्यामध्ये होतो आहे तसा होणं हे फार महत्त्वाचं वाटतं मला. आणि साऱ्याजणीची वेगळी छाप अशा संवादांमुळेच आहे. मला विद्याताई आणि त्यांच्या सगळया टीमविषयी फार आदर वाटतो.
....अजून पुष्कळ बोलायला आम्हांला आवडलं असतं. पण वेळेची मर्यादा होती. फोन संपवत आणला. मागून माझ्या आईनं `अमृताला तिचा लेख आवडला' असं सांगायला सांगितलं. तसं संागितल्यावर ती स्वच्छ हसली आणि म्हणाली, ``तुझ्या आईला थॅंक्स सांग आणि पुढचा लेख `अप्रूप' या विषयावर असेल हेही सांग!''
जगण्याचं सारं अप्रूप जी मुलगी हरवून न देता पेलू शकते तिचं नाव बहुधा अमृता सुभाष असावं!