आज 'सार्‍याजणी'त नसूनही......

``मिळून साऱ्याजणी' ला ऑगस्ट २००९ मध्ये २० वर्षं पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने तू तुझ्या `साऱ्याजणी'तल्या अनुभवांबद्दल लिहिशील?'' असं विद्याताइंर्नी विचारलं आणि वाटलं, बाप रे! २० वर्षं झाली मासिकाला? आणि मला काम सोडून दहा वर्षं?
`साऱ्याजणी'पासून तशी मी मनाने कधी दूर गेलेच नाही. आणि याचं कारण म्हणजे - आज मी जी काही पुस्तकाच्या संपादनाची, निर्मितीची, लिखाणाची छोटी-मोठी कामं करते आहे, माझे विचार मांडते आहे, राजकीय क्षेत्रात काही स्पष्ट भूमिका घेते आहे या माझ्या जडणघडणीत `साऱ्याजणी'चा - विशेषत: विद्याताइंर्चा खूप मोठा वाटा आहे. विद्याताइंर्च्या खंबीर आधारामुळेच वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मी ठामपणे उभी राहिले.
----
`मिळून साऱ्याजणी'च्या ऑफिसमध्ये गेल्याचा पहिला दिवस मला चांगला आठवतो आहे. मासिकाला एका मुद्रितशोधकाची (प्रूफ रीडर) गरज होती आणि त्यासाठी नीलिमा शिकारखाने या मैत्रिणीने विद्याताइंर्ना माझं नाव सुचवलं होतं. या संदर्भात विद्याताइंर्ना भेटायची प्रचंड उत्सुकता होती. तसंच मनावर एक दडपणही होतं.
वर्तमानपत्र-मासिक यामध्ये काम करण्याचा थोडाफार अनुभव मला होता पण प्रूफरिडींग मात्र कधी केलं नव्हतं.
विद्याताइंर्शी ओळख झाल्यावर अर्थातच त्यांनी मला माझ्या अनुभवाबद्दल विचारलं. तेव्हा, ``मला प्रूफरिडिंग येत नाही पण मी ते शिकून घेईन आणि काम करेन'' असं सांगितलं. प्रूफरिडिंगमध्ये तज्ज्ञ असणारी माझी मैत्रीण माधुरी चव्हाण या संदर्भात मला मदत करणार होती. विद्याताई बहुधा नाहीच म्हणतील असं वाटत होतं, पण त्या छान आश्वासक हसत म्हणाल्या, ``काही हरकत नाही. कर तू काम.''
आज या गोष्टींचा विचार करताना वाटतं, मला प्रुफरिडिंग येत नसताना नीलिमाने माझं नाव सुचवणं, मी त्यासाठी तयार होणं, आणि विद्याताइंर्नी हो म्हणणं... सगळंच मजेशीर होतं. पण एकमेकांवर ठेवलेला विश्वास हा या सर्वांत महत्त्वाचा घटक होता. विद्याताइंर्नी माझ्यावर विश्वास ठेवला. तो सार्थ करण्याची पुरेपूर धडपड मी केली. काम मला नुसतं आवडलंच नाही, तर मी पूर्णपणे त्यात बुडून गेले. सुरुवातीला मी घरूनच काम करायचे. प्रुफरिडिंग बरोबरच लेखनाच्या संदर्भातले माझे विचार मी विद्याताइंर्ना नेहमी सांगायचे, तेव्हा त्यांनी माझ्यावर ऑफिसमध्ये येऊन आलेलं साहित्य वाचण्याचं कामही सोपवलं. ऑफिसमध्ये जायला लागल्यावर विद्याताइंर्बरोबरची इंटरॅक्शन वाढली. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सांगितलं तेवढंच काम करणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे मला शक्य होईल तेवढं इतरही काम मी करायचे कारण तो माझ्या आनंदाचा भाग होता. या स्वभावामुळे अंकाच्या संदर्भात खूप शिकायला मिळालं.
प्रुफरिडिंगच्या कामात लेखनातल्या चुका शोधून ते जास्तीत जास्त शुद्ध करणं, संपादकीय कामात ते वाचनीय करणं आणि निर्मितीच्या कामात ते देखणं करणं ही कामं उज्ज्वला-नयन-मंदाताई यांच्या बरोबर करत असताना ऑफिसमधल्या इतर काही त्रुटीही माझ्या लक्षात यायला लागल्या आणि काही गोष्टींत शिस्त आणण्याची गरजही वाटायला लागली. पुष्पाताई मासिकाच्या हिशोबाचं आणि वितरणाचं काम बघायच्या. शरयू त्यांना मदत करायची. दर महिन्याला अंक वितरीत करण्यासाठी त्या पोस्टाची तारीख घ्यायला जायच्या. मला वाटलं दर महिन्याला अशा वेगवेगळया वेळी पोस्टिंग करण्यापेक्षा महिन्यातून एका ठरावीक तारखेलाच पोस्टिंग केलं तर चालणार नाही का? पोस्टाला अर्थातच ते जास्त सोईचं होतं, पण अंक केव्हा तयार होईल हे निश्चित नसायचं.
मग आम्ही ठरवलं की एक तारीख निश्चित करून त्या तारखेच्या ३/४ दिवस आधी अंक काढायचाच. कारण पत्ते लिहिणं आणि अंक पाकिटात भरणं यासाठी तेवढा वेळ लागायचा. त्या वेळी पुष्पाताई आणि शरयू सगळया अंकांवर हाताने पत्ते लिहायच्या.
मग सुरुवातीला १० तारीख ठरवून अंकाचं सगळं वेळापत्रक त्याप्रमाणे आखून आम्ही कामाला लागलो. एकदा १० तारखेची ही शिस्त जमल्यानंतर ही तारीख ५ वर आणि मग १ वर आणली. मग दर महिन्याला नियमितपणे अंक आधीच्या महिन्यातल्या २५ तारखेपर्यंत तयार होऊन १ तारखेला पोस्टात पडायला लागला. या एका छोट्याशा बदलामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या. दर वेळेला पोस्टात जाऊन पोस्टिंगची तारीख घ्यायची हे काम कमी झालं. अंकाचा ताजेपणा टिकण्याचा कालावधी वाढला. स्टॉलला अंक जास्त विकला जायला लागला. अंकाचं डीटीपी, लेआऊट करणाऱ्यांना तसंच प्रिंटर-बाइंर्डरलाही अंकाचं काम ठरावीक काळात आल्यामुळे सोईचं झालं. हीच शिस्त अंकाच्या इतर कामातही आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा चांगला उपयोग झाला.
साहित्यवाचन, पत्रव्यवहार, अंकाची निर्मिती, संपादकीय साहाय्य याबरोबरच ऑफिसमधली पडतील ती कामं असं करता करता कार्यकारी संपादक म्हणून मी मासिकाची संपूर्ण जबाबदारी पार पाडायला लागले. त्यावेळी साऱ्याजणीचं ऑफिस विद्याताइंर्च्या घरातच होतं. ऑफिसात त्यामुळे एक अनौपचारिक वातावरण असायचं. कामाच्या समाधानाबरोबरच हे वातावरण हवंहवंसं वाटणारं होतं. गौरी-सानिया, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेन्द्र दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू, अरुणा ढेरे, शांताबाई शेळके, सुषमा देशपांडे, मेघना पेठे, कविता महाजन, प्रा. यशवंत सुमंत यांच्यासारखे कितीतरी साहित्यिक, चित्रकार, लेखक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते कलाकार यांना भेटण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची, गप्पा मारण्याची, त्यांच्याकडून लिहून घेण्याची आणि त्यातून नवीन काही शिकण्याची संधी मला मिळाली. मासिकाच्या प्रत्येक कामात लक्ष घातल्यामुळे त्याचं सामाजिक महत्त्व, आर्थिक गणित, वाचकांच्या अपेक्षा आणि मासिकाची जबाबदारी याचं भान आलं. मासिक आकाराने-खपाने-विचारानेही वाढत होतं. त्यामुळे माझ्यावरच्या जबाबदाऱ्याही वाढत होत्या. विद्याताई या `बॉस' कधीच नव्हत्या आणि आता तर त्या एक जवळची मैत्रीणच झाल्या होत्या. विद्याताइंर्बरोबरच अनेक मित्रमैत्रिणींचा एक अनमोल खजिना मला `साऱ्याजणी'नं दिला.
विचाराला सतत नवीन खाद्य मिळणं, त्याची इतरांबरोबर चर्चा करता येणं, त्याचं प्रतिबिंब मासिकात दिसणं हे काम खूप समाधान देणारं होतं. मासिकाला उत्तरोत्तर मिळणारा प्रतिसाद, येणारी पत्रं, वाढणारा परिवार, मिळणारी बक्षिसं हा उत्साह वाढवणारा होता. असं जरी असलं तरी शेवटी या मासिकाचं उद्दिष्ट कुठे नजरेआड होऊ नये याची जाणीव मला होतीच. खप वाढविण्यासाठी केवळ लोकप्रिय साहित्य देणं हे मासिकाचं ध्येय कधीच नव्हतं.
मासिक स्त्रीवादी होतं/आहे. स्त्रीचळवळीचं मुखपत्र जरी नसलं तरी उद्देश तोच होता आणि स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात रुजवणं हाच त्याचा पाया होता.
पुरुषप्रधान समाजाकडून होणाऱ्या स्त्रियांवरच्या अन्याय-अत्याचाराची कल्पना मला असली तरी त्याची व्याप्ती मला इथे समजली. असा अन्याय स्त्रिया कळून आणि न कळून पण सहन करतात. परिस्थितीला टक्कर देतात. काही जणी हताश-निराश होतात, पण काही पुन्हा तडफेनं उभ्या राहतात. अनेकींचे अनेक अनुभव ऐकायला मिळाले. परिस्थितीचा विचार त्या कशा करतात, त्यातून मार्ग कसा काढतात, समाजाचा-धर्माचा त्यांच्यावरचा प्रभाव त्यांना मदत करतो का त्यांना अडचणीत आणतो. कुटुंबातून-समाजातून त्यांना दिले जाणारे सल्ले, हे त्यांच्या हितासाठी असतात का कुणाच्या स्वार्थासाठी असतात, या सगळयामागे काय राजकारण असतं या गोष्टी लक्षात यायला लागल्या.
चळवळ, आंदोलन, लढा याचा मला अनुभव नव्हता आणि तो माझा पिंडही नव्हता. त्यामुळे मासिकातून या संदर्भात जास्तीत जास्त काय करता येईल इकडे माझं लक्ष केंद्रित झालं होतं. मासिकाचं काम करणारे मित्रमैत्रिणी, मासिकाचा परिवार, आजूबाजूचं वातावरण आणि एकंदरीतच राज्यातलं, देशातलं राजकारण (त्या वेळी राज्यात युतीचं आणि केंद्रात रालोआचं सरकार होतं.) या संदर्भात मला अनेक प्रश्नं पडायला लागले होते. पण आपल्या विचारांचा कस लागणाऱ्या घटना जोपर्यंत घडत नाहीत तोपर्यंत सगळं छानच वाटत असतं. अर्थात तोपर्यंत ते खरंही असतं. पण अशा काही घटना घडल्यानंतर मात्र सगळयाकडे बघण्याची आपली दृष्टीच बदलते तसं काहीसं घडलं.
९२ च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद पाडली गेली. या घटनेचा मला जबरदस्त धक्का बसला. पुढचे सगळे अनर्थ डोळयांसमोर उभे राहिले. ऑफिसमध्ये काही जणांनी या घटनेचा आनंद व्यक्त केला. (विद्याताइंर्नी नाही) हा धक्का तर समजण्याच्या पलीकडचा होता. पुरोगामी विचाराने काम करणाऱ्या, सतत त्या वातावरणात राहणाऱ्या, त्याबद्दलच गप्पा-चर्चा असणाऱ्या या ऑफिसमध्ये अशा प्रतिक्रियेची अपेक्षा मला नव्हती. मी अर्थातच अनेकांशी हिरीरिने वाद घालत होते. घडलेली घटना कशी चूक आहे. देशात धर्मद्वेष आणि धर्मांधता वाढवण्याचा कसा पद्धतशीर प्रयत्न होतो आहे. मूलतत्त्ववादी पक्ष सत्तेवर आला तर ते स्त्रियांच्या बाबतीत कशा चुकीच्या भूमिका घेण्याची शक्यता आहे. स्त्री चळवळीने ज्या गोष्टी मोठ्या कष्टाने साध्य केल्या आहेत त्या हातातून निसटण्याची आणि समाज पुन्हा मागे ढकलला जाण्याचा धोका कसा आहे. इ. इ.
मला वाटलं, पुरोगामी विचाराने काम करणाऱ्या या ऑफिसमध्ये जर अशी मतं व्यक्त होत असतील तर बाहेर काय परिस्थिती असेल? तर आजूबाजूचं चित्र काही फारसं आशादायी नव्हतं.
बाबरी मशीद पाडणं, नंतर उसळलेल्या दंगली, अमानुष हिंसाचार आणि या सगळयाचा चुकीच्या दिशेने विचार करायला प्रवृत्त झालेला समाज यामागच्या राजकारणाचा विचार समजावून घेण्यासाठी वाचकांना प्रवृत्त करावं, मूलतत्त्ववादी पक्ष सत्तेवर येण्यानं स्त्रियांचं सगळयात जास्त नुकसान होणार आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं, स्त्रियांना एक मतदार म्हणून राजकीयदृष्ट्या जागरूक करावं, असं मला वाटायला लागलं.
स्त्रीवाद्यांनी प्रतीकात्मकरित्या मनुस्मृती जाळणं यापेक्षा मनुस्मृतीला मान्यता देणारा पक्ष सत्तेत येऊ नये यासाठी प्रयत्न करणं मला जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं. याच काळात पत्रकारितेचा पदविका कोर्स मी केला आणि त्यामुळे तर माझी मतं जास्तच टोकदार झाली. या टप्प्यावर विद्याताइंर्बरोबर माझे मतभेद व्हायला लागले. त्यांना वाटायचं आपलं मासिक राजकीय नाही. मला वाटायचं राजकारणाचा विचार केला नाही तर स्त्रीमुक्तीला काही अर्थ नाही. एका बाजूला आमची वैयक्तिक मैत्री घट्ट होती पण वैचारिक मतभेद मात्र वाढायला लागले होते. एकदा मतभेद सुरू झाले की मग किरकोळ गोष्टींनाही आपण फार महत्त्व देतो, तसं व्हायला लागलं. मग तो अंकात पाकक्रिया देण्याचा मुद्दा असो की कार्यक्रमाला आशा भोसले यांना बोलावण्याचा मुद्दा असो. माझा या गोष्टींना तीव्र विरोध असायचा. आपण फार व्यापारी (कमर्शिअल) होतो आहोत का? प्रबोधनाच्या विचारापासून दूर जातो आहोत का? मासिकाचं वैशिष्ट्य गमावतो आहोत का? वैचारिकदृष्ट्या पुढे जायचं नाकारतो आहोत का? अनेक शंका मला कुरतडायला लागल्या होत्या. विद्याताइंर्ना मासिक वाचवायचं होतं, टिकवायचं होतं. त्यांच्यापुढेही काही व्यावहारिक अडचणी असतील पण त्यासाठी वैचारिक तडजोडी करणं मला कठीण व्हायला लागलं.
विद्याताइंर्बरोबरच्या मैत्रीत मला कुठलीही कटुता येऊ द्यायची नव्हती, म्हणून शेवटी मासिकातून दूर होण्याचा निर्णय मी घेतला. विद्याताइंर्नी तो मोकळया मनाने स्वीकारला.
आता मासिकाला २० वर्षे पूर्ण होत आहेत, त्याचा मनापासून आनंद आहे. मासिकाच्या पुढच्या वाटचालीत स्त्रियांना राजकीयदृष्ट्या जागरूक करण्याच्या कामात मासिकानं पुढाकार घ्यावा ही अपेक्षा आहे आणि त्यासाठी भरपूर सदिच्छाही आहेत!

http://www.kodes.com/category

http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015