नवागड हे एक लहानसं संस्थान किंवा मोठं जमीनदारीचं गाव. या गावाच्या सीमेलगत बस-रस्त्यापाशी लहानशी एक वस्ती. नवागडच्या जमीनदाराला `राजा' ही पदवी दिली जात असे. भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी राजेसाहेबांचं वय होतं एक वर्षाचं. तरीही ते राजेसाहेब म्हणूनच ओळखले जात. संस्थान गेलं तरी राजेसाहेबांचा दबदबा कायम होता. संस्थानाच्या हस्तांतराच्या वेळीच भरपूर जमीन नियमानुसारच पंचवीस देवांची देवस्थाने करण्यासाठी राखून ठेवण्यात आली असली तरी खरं तर राजेसाहेबांवर खूपच अन्याय झाला होताच ना! राज्यसरकारचं पाप! बसचा रस्ता व रेलगाडीसाठी रूळ टाकण्याकरता राज्यसरकार व केंद्र सरकार यांनी मिळून कितीतरी जमीन खास कारणांसाठी घेतली होती.
राजेसाहेब किशोरावस्थेत असतानाच या सगळया घडामोडी होऊन गेल्या होत्या. कर्तव्यदक्ष राजमाता व त्यांचे खास वकील दोघेही बिचारे या भयंकर अन्यायाच्या धक्क्यामुळे मरून गेले. त्यानंतर तिकडे रांची व पाटण्याच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार सरकारतर्फे राजेसाहेबांच्या गुजराणीची व्यवस्था करवून घेणं, बरीचशी सुपीक जमीन मिळवणं वगैरे सुरू होतं. याशिवाय जंगल कटाईची ठेकेदारी, लाकडं कापण्याचा कारखाना, लॉरी-ट्नन्सपोर्टच्या धंद्याचा परवाना इत्यादी सर्व गोष्टी पक्क्या झाल्यानंतर मग अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची तयारी सुरू झाली.
सहा वर्षे प्रयत्न केल्यानंतर प्रतिकार-मोहीम काहीशी यशस्वी झाली. त्यामुळे नवागडमध्ये आज खूप धूमधाम. प्राथमिक शाळेला सुट्टी. राजमाता-ट्नन्सपोर्टच्या शंभर लॉऱ्यांनाही सुट्टी.राजेसाहेबांच्या `शूरनिवास' नावाच्या प्रासादातून रंगीत कापडानं झाकलेल्या मिठाईच्या टोपल्या व थाळया तोहरीच्या कचेरीत, टाहाडच्या शिवमंदिरात व अन्यत्र सौगात म्हणून पाठवल्या जात होत्या.
खूप दिवसानंतर नवागडमध्ये सगळयांना मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. राजेसाहेबांनी फर्मान सोडलं होतं- धूम मचाओ, खुषी मनाओ, घरघरमे दीप जलाओ- अर्थात् हे सगळं स्वखर्चानं! इतकं धडाक्यानं सगळं झालं नाही खरं; पण तरीही सगळयांना जरा हलकं वाटत होतं. वातावरण निवळल्यासारखं दिसत होतं.
कारण दहाएक महिन्यांपूर्वी राजेसाहेबांच्या भागीदार शेतकरी कुळांमध्ये खूपच क्षोभ दिसत होता. गेल्या आठेक वर्षांपासून हे असंच सुरू होतं; पण तरीही कधी पोलीस चौकी बसवली नव्हती. आधी राजेसाहेबांचे लोकच कुळांना मारझोड करत, मग पोलीस येत. कुळांना चिथवणारे जे म्होरके आहेत असे वाटे त्यांना धरून घेऊन जात.
- असंच होत आलंय, होतच असतं. नवागडची माती जितकी प्राचीन तितक्याच या घटनाही.-
यातच वर्षावर्षाला कुळांची संख्या वाढत होती. शेतातल्या पिकातला त्यांचा वाटा व अधिकार याबाबतीतली जाणीवही वाढली होती. यात कुठली तरी तिसरीच शक्ती कार्यरत आहे की काय अशी शंका पोलिसांना येऊ लागली होती. ही तिसरी शक्ती म्हणजेही एखादा विशिष्ट गट नव्हे तर त्यात कोणी कम्युनिस्ट, कोणी आदिवासी-हितसंरक्षक, कोणी जहालपंथी वगैरे एकत्र झालेले असणार, पण सगळे साले या किसानांना मदत करणारेच.
नुकतीच पुन्हा गडबड सुरू झाली होती. तीन महिन्यांपूर्वी कुळांनी उठाव केला त्या वेळी त्यांनी कापडावर `मेहनत के फसल का आधा हिस्सा पाना हमारा मूलभूत अधिकार है' असं लिहून ते कापड दोन्ही बाजूंनी दोन बांबूंना बांधून मोर्चा काढला होता.
सगळंच आक्रीत! काय हे? ही कुळं म्हणजे राजेसाहेबांची आश्रित प्रजा, आणि तेच म्हणतात की श्रमाच्या पिकावर त्यांचा न्याय्य अधिकार? वा रे वा! भलतंच काहीतरी आणि यांच्यातल्या कोणाला लिहिता येतं? कोणी लिहून दिलं हे?
राजेसाहेबांना त्यांची ही फसवणूक बघून खूपच दु:ख झालं. केवढा हा अन्याय? आपण फारच अत्याचारित व शोषित आहोत अशी भावना होऊ लागली. कारण एकतर सरकारनं त्यांची जमीन बळकावून घरं बांधली, रेल्वेलाइन टाकली- अर्थात या सर्व कामांसाठी त्यांच्याच राजमाता- ट्नन्सपोर्टच्या लॉऱ्या भाड्यानं घेऊन लाकडं, कोळसे, धान, कुली वगैरे आणण्यात आले. रेलगाडीच्या वॅगनमधूनही त्यांच्याच कारखान्यात चिरून तयार केलेले तक्ते वापरण्यात आले; पण या तर साऱ्या चिल्लर बाबी! सरकारच्या या अन्यायाला प्रतिकार करताकरताच इकडे कुळांचे अत्याचार सुरू झाले! पिकात वाटा हवा म्हणे, सरकारच्या श्रमविभाग-कचेरीतल्या नियमानुसार वाटणी हवी! यावर्षी तर कहरच झाला. कुळांनी राजेसाहेबांच्या लोकांना पिकाला हातच लावू दिला नाही. म्हणाले- मारा साल्यांना! मारतामारता मथुरासिंगला जखमी केलं, चंदनमलच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली. शेवटी करणार तरी काय? राजेसाहेबांना स्वत:लाच बंदूक चालवून काही लोकांना ठार करावं लागलं.
- हे होतं, होतच असतं, नवागडची माती जितकी प्राचीन तितक्याच या घटनाही.-
एखादी आजी नातवाला झोपवताना चित्तथरारक गोष्ट सांगते- उसके बाद आए राजासाब! बोले के ए दुखिया, ये क्या झंझट है? तब तेरे नानाजी बोले- कैसी झंझट जी? हमे अपने मेहनत की फसल दिया करो और आप के हत्यारे सिपाही लोगों को यहाँ से जाने को कहो. उसके बाद खुद राजासाबने गोली चलाई और मार डाला तोहरे नानाजीको. कलेजा से इतना खून बहा, इतना खून बहा के जैसे सावन-भादो मे गंगाजी का पानी!
- हे होतं, असंच होत असतं. जमिनीचे श्रीमंत मालक आणि गरीब किसान- शेतमजूर- कुळं यांची कहाणी अशीच असते. कोणीच कधीही ही कहाणी बदलू शकत नाही.-
पण या वेळी मात्र वेगळंच घडलं. ते लोक मारतामारता आणि मार खाताखाता चक्क घोषणा देत होते- मेहनत के आधे हिस्सेपर हम लोगों का अधिकार है....
हे असं नवागडच्या मातीच्या आयुष्यात कधी घडलं नव्हतं. त्यामुळे नवागडमध्ये पोलिसांची चौकी बसवण्यात आली. दुखियाचं प्रेत चालान झालं. जखमी लोक इस्पितळात. कुळांवर कायदेभंग व शांतिभंग केल्याचे आरोप नोंदवण्यात आले. त्यात एक नवीनच प्रकरण उद्भवलं. कुळांच्या युनियननं कोर्टात अर्ज करून टाकला. म्हणजे तेही आता कोर्टाची लढाई लढणार! या सर्व कारणांमुळेच नवागडमध्ये पोलिसांचा कँप बसवला गेला. तीन महिने सगळीकडे अगदी सामसूम होती. याच काळात राजेसाहेबांना काय प्रतिसाद मिळाला कोणास ठाऊक; पण वातावरण जरा निवळलं. काय झालं असावं याचीच चर्चा सर्वतोमुखी...
भिका मेंढपाळाला कोणी विचारतही नसे. कशाला विचारणार? कोणी ढुंकूनही पाहत नसे त्याच्याकडे. बिचारा खूपच भित्रा आणि निरुपद्रवी माणूस. बकऱ्या पाळणं हाच त्याचा धंदा. बकऱ्या चारत फिरायचा. हाच धंदा त्याला परवडणारा. कारण बकऱ्यांची जातच अशी की त्यांची काही काळजी घ्यावी लागत नाही, देखभाल करावी लागत नाही. कुठलीही पानं खातात, गवतही खातात, शिवाय वर्षातून पुष्कळदा पुष्कळ पिल्लं जन्माला घालतात.
दुसरा कोणी असता तर बकऱ्यांचा व्यवसाय करून नशीब काढलं असतं; पण भिका बिचारा कमनशिबी! त्याच्या बकऱ्यांनी जणू संतति-नियमनाचा वसा घेतलेला- दोन बकऱ्या, एक बकरा नाहीतर एखादी बकरी आणि दोन बकरे- यापेक्षा जास्त संतती नाही. काय करणार? भिक्याचं नशीबच फुटकं!
दुसऱ्या लोकांना बकऱ्यांच्या धंद्यात फायदा होतो, भिक्याला का होत नाही?
कसा होईल? जंगलात चरायला न्यायचा. कोल्हे-लांडगे झडप घालून ओढून न्यायचे. मग भिका दुकानात जाऊन म्हणायचा- एक पाव सत्तू द्या लालाजी, थोडं पाच पैशाचं लिंबाचं लोणचं आणि पाच पैशाचं मीठ पण द्या.
- बस्, एवढ्यात भागेल तुझं?
- हो लालाजी, भागून जाईल.
- अरे भिक्या, तू बकऱ्या बाजारात नेऊन का विकत नाहीस? भरपूर पैसे मिळतील.
- काय करू जी, मला कोणी जास्त दामच देत नाही.
भिका मिंधेपणानं हसायचा आणि आपल्या क्षुद्र अस्तित्वाची जाणीव होऊन शरमून निघून जायचा. कधीकधी तो धडधाकट बकरे हाकलत जीव घेऊन जंगलाकडे पळत जाताना दिसायचा. चेहऱ्यावर भयंकर भीती आणि काळजी. तोंडाला फेस. भिक्याला जेव्हा खूप भीती वाटायची तेव्हा त्याची जीभ कोरडी पडायची. ओठांच्या कडांना फेस जमायचा. सुरुवातीला हे असं पाहून नवागडच्या लोकांना आश्चर्य वाटे, म्हणत
- काय झालं रे भिक्या?
- पोलीस, पोलीस आले पोलीस!
- अरे, पण तुला काय त्याचं?
- बकरा उचलून नेतात ते लोक.
पळायचा, धापा टाकत पळायचा भिका. जंगलात कोल्हे-लांडगे असतात, ते तर बकऱ्यांचे शत्रूच; पण भिक्याचे शत्रू पोलीस.
तो जंगलात घुसायचा. विळयानं झाडाच्या फांद्या तोडून बकऱ्यांसाठी खुराडं तयार करायचा. त्यात सर्व बकऱ्या कोंडून बाहेर पहारा देत रहायचा.
त्याची संपत्ती म्हणजे फक्त बकऱ्याच. दुसरं काहीच नाही. जमीनजुमला नाही, बायकापोरं नाहीत की काही कामही नाही. एक लंगोटी नेसणं नि बकरे चारणं. हे काही वाईट काम नाहीच. कधीतरी दहा-पंधरा बकरे झाले की मग भिक्या ते सुमादीच्या बाजारात घेऊन जाणार होता. खूप भाव घेऊन विकणार होता. फक्त एक गाभण बकरी ठेवून बाकीचे सगळे विकून खूप पैसे मिळवणार होता.
मग एखादं लांबरुंद धोतर घ्यायचं. एरवी तो आखूड धोतराचा तुकडाच लंगोटीसारखा गुंडाळत असे. एक नवीन पंचा घ्यायचा. मग सुमादीला किंवा दुसरीकडे कुठे मेंढपाळांची वस्ती शोधायची. बाजारात न्हावी लोक येतात, ते नक्कीच सांगू शकतील. एखादी झोपडीही तिथे बांधून टाकता येईल. मग एखाद्या विधवा किंवा वयस्क मेंढपाळणीशी लग्न करायचं, दोघंजण असली की बकऱ्यांची संख्याही वाढेल.
पण भिक्याची स्वप्नं कधीच वास्तवात उतरत नसत. बाढा नावाच्या गावातल्या मेंढपाळांनी जंगली जमिनीवर एक वस्ती मांडली होती. तिथे गेल्यावर भिक्याचं जरा बरं चाललं होतं; पण करणार काय, नशीब पाठलाग करत येतंच! ते बाढाचे मालक गणेश सिंग होते ना! त्यांच्याशी मेंढपाळांचं काय भांडण लागलं कोणास ठाऊक; पण त्यांनी संतापून गणेश सिंगला मारूनच टाकलं. झालं! पोलीस आले आणि मेंढपाळांचे बकरे-बकऱ्या उचलून नेऊ लागले. भिका पुन्हा भणंग!
खूप रडला तो. या बकऱ्यांशिवाय त्याचं काहीच नाही; पण हे पोलिसांना समजत नाही. शेवटी राका नावाचा मेंढपाळ म्हणाला- एक गाभण बकरी घेऊन पळ इथून. नाढा गावात काही गडबड नाही, बकऱ्या चारायला चांगलं मैदानही आहे. तिथे वडाच्या झाडाखाली रहा.
मग वडाच्या झाडाखाली कुडाची झोपडी, बकरीला पिल्लं झाली. ती मोठी झाली. नाढा गावातले मालक सगळे रजपूत. मांसाहारी. अंगात खूप ताकद. ते भिक्याकडे ढुंकूनही पाहात नसत; पण मांस खायचं असलं की खूप कमी किंमतीत, आठ-दहा रुपये देऊन बकरे घेऊन जात. दहा-पंधरा शेर मांसाची किंमत इतकी कमी असते का? पण काय करणार? सगळंच काही सगळयांच्या नशिबात नसतं; पण एकदा काय झालं की नाढा गावातल्या एका धनी मालकानं गोळी घालून एका बाईला ठार केलं. होळीच्या दिवशी ती बाई नाचणाऱ्या-गाणाऱ्यांच्यात होती. बस, मग काय? नाढा गावात पोलिसांचं ठाणं बसलं. पोलीस बघताच त्या मालकानं फर्मान दिलं- जा, त्या भिक्याकडून बकरा घेऊन या. पोलिसांना मेजवानी देण्यासाठी तीन दिवस एकापाठोपाठ तीन बकरे दिल्यावर भिक्या तिथून पळून गेला.
सर्वांसाठी ही दुनिया खूप मोठी असली तरी बिचाऱ्या भिक्यासाठी फारच लहान होती. दु:खी भिका नाढाहून टाहाडला गेला. टाहाडच्या शिवमंदिरातला पुजारी हनुमान मिश्र याला नमस्कारही करून आला.
काय तेज:पुंज रूप त्या पुजाऱ्याचं! गोरापान रंग, शरीरातून जणू प्रकाशकिरण बाहेर पडावेत! कसं असणार नाही सांगा. रोज दूध पितो, दुधानंच स्नान करतो आणि प्रत्यक्ष भगवान महादेवाशी बोलतो.
मग भिका जंगलाकडच्या मेंढपाळांच्या वस्तीकडे गेला. टाहाडच्या मेंढपाळांनी त्याला प्रेमानं आपल्यात सामावून घेतलं. बकऱ्या चारताना एक म्हातारी मेंढपाळीण त्याच्या गाभण बकरीची देखभाल करायची, त्याला खायलाही घालायची. ते लोक म्हणत की राहून जा इथेच. आमच्या समाजात तेवढंच एक जास्तीचं माणूस. लग्नाची व्यवस्थाही जमली तर करून देऊ.
मजेत होता भिका; पण त्या पुजाऱ्याकडे एकदा एक दरोगा आला. सात दिवस राहिला टाहाड गावात. पुजारी म्हणाला- भिक्या, एक बकरा दे दरोग्याला खायला.
-हा तर विकायला घेऊन जात होतो, महाराज.
- काय? अरे, पोलीस-दरोगा वगैरे देवदेवतांच्याही वर! त्यांना खायला घालायचं तर तुला पैशाच्या गोष्टी सुचतात?
बकरा भेट देऊन टाडाड सोडलं भिक्यानं. तिथल्या मेंढपाळांना वाईट वाटलं; पण करणार काय? त्या मेंढपाळांकडे मजुरीचं, शेतमजुरीचं, जंगलातली सुकी लाकडं जमवण्याच्या कामाचं परमिट होतं. भिक्याजवळ काहीच नाही. मेंढरंच त्याचं सर्वस्व, मेंढरं पाळायची, विकायची हेच काम; पण पोलीस येऊन सारखे त्याचं एकमेव उपजीविकेचं साधन लुटून नाहीसं करून टाकत.
खरंतर त्याला ही टाहाडची वस्ती खूप आवडली होती. सर्वांत दरिद्री असूनही तिथं भिक्याला कोणी हिडिसफिेडस केलं नाही. बुढीमा रोज कण्यांची लापशी अन् गिलक्याची भाजी करून द्यायची. हरोआच्या बायकोनं छटपूजेचा प्रसाद म्हणून मुलाच्या हातून थोडं करवंदाचं लोणचं पाठवलं होतं. हरोआनं एकदा एक साळू मारली तेव्हा त्याचं मांसही भिक्यानं खाल्लं होतं.
पुन्हा एकदा सर्व सोडून तो नवागडला परत आला. प्रायमरी शाळेतले मास्तर सुखचंदजी भले गृहस्थ होते. शाळेच्या कौलारू इमारतीपासच्या वडाच्या झाडाखाली बसून भिक्याशी गप्पा मारत. तरुण वय, अजून या भागातल्या रीतिरिवाजांची कल्पना नव्हती. म्हणाले- रात्री मी प्रौढांना लिहिणं-वाचणं शिकवतो, तिथं तू पण येत जा, भिका.
- कसं होणार महाराज हे? तुम्ही भिक्याला शिकवता म्हटलं की बस्! भागो भिका नवागडसे. राजेसाहेब हाकलतील, पोलीस येतील, लालाजी दुकानातलं सामान देणार नाहीत, विहिरीतलं पाणीही प्यायला मिळणार नाही.
- हे कसं काय बाँ?
- असंच असतं, सुखचंदजी. एकदा एक टॉर्च बघून विचारलं होतं- याची किंमत काय लालाजी? तर काय भडकला तो लाला! म्हणाला- साल्या भिक्या, नीच जातीचा मेंढपाळ तू अन् आता टॉर्च घेऊन फिरणार की काय?
जंगलात बसून या सर्व घटना आठवत त्या भिक्याला, सारखा विचार करत बसायचा तो. हे पोलीस लोक लालजीचं दुकान लुटत नाहीत, गवळयांच्या गाई धरून नेत नाहीत. ज्याचं जे असतं ते त्याचंच राहतं. फक्त त्याचेच बकरे का हिसकावून नेतात? त्याच्यापाशी तर बकऱ्यांशिवाय काहीच नाही दुसरं!
मग बकऱ्यांना खुराड्यात कोंबून, भगवान रामजींनाच बकऱ्यांकडे लक्ष ठेवण्याची प्रार्थना करून भीतभीत तो नवागडात आला. छाती धडधडत होती त्याची. स्वत:च्या झोपडीत आला तर लंगडा, कानी, कुष्ठरोगी दोरा वगैरे परिचितांनी त्याला सांगितलं की पोलीस अजूनही ठाण मांडून आहेत, पळ इथून.
पाण्याचं मडकं, सत्तू आणि गूळ घेऊन भिका जंगलात परतला. रामजींच्या कृपेनं बकऱ्या शाबूत होत्या. तेही कधीकधी विसरून जातात ना भिक्याची प्रार्थना! मग एखादी बकरी लांडगा ओढून नेतो, एखादीला साप चावतो, पिल्लाला कोल्हा पळवतो.
जंगलात जाऊन भिक्यानं बकऱ्यांना पाणी पाजलं. स्वत: धोतराच्या एका टोकात गूळ-सत्तू कालवून खाल्लं. असे कसेतरी दोनतीन दिवस गेले. त्याला रोजच नवागडला जावं लागे. पोलिसांची नजर चुकवून तो परत येई. या वेळी तीन महिने उलटले तरी पोलीसचौकी नवागडमधून हलेना. भिका जंगलात राहून अगदी जंगली श्वापदच होऊन गेला. जंगलाच्याच कडेकडेनं राढाकडे निघून गेला. तिथे जंगलातच त्याला राका मेंढपाळ भेटला. राकानं मदत केली नसती तर भिका आता जंगलात राहू शकला नसता.
राकानं त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं. मग म्हणाला- ठीक आहे, पाहतो मी.
मग राका तीनचार मेंढपाळांना घेऊन आला. भिक्याला चांगलं पक्कं खुराडं बांधून दिलं. वर फांद्यांचं छप्पर. म्हणाला- रहा इथं. त्या नाल्यातून पाणी मिळेल.
- पण खाऊ काय?
- पैसे दे, सामान आणून देतो.
- हे घे.
काही दिवसांनी राका म्हणाला- हा एक बकरा म्हातारा झालाय, किती दिवस जगेल कोणास ठाऊक, विकून टाक.
- कुठे विकू?
- बाजारात.
- तोहरीच्या?
- आणखी कुठं?
- कधी गेलो नाही मी.
- विश्वास असेल तर मला दे, मी विकतो.
- हे काय राका, विश्वास कसा नसेल?
- पाहू या.
बकरा विकून पुरे साठ रुपये मिळाल्यावर भिका अन् राका स्वत:ला राजाच मानू लागले. तीन महिन्यांनी एका बकरीला पिल्लं झाली. मग आणखी एक बकरा विकून सामानसुमान आणायला पैसे दिले राकाला.
राकाच म्हणाला- आता पोलीस नाहीत. मधूनमधून वस्तीत येऊन जात जा. राढाच्या वस्तीतच एकदिवस कनू मेंढपाळ म्हणाला की नवागडमधूनही पोलीस निघून गेले.
- खरंच?
- तसंच तर ऐकतोय.
भिक्याला वाटलं आता परत जायला हरकत नाही. चांगल्या आठ-आठ बकऱ्या झाल्या आहेत. दोन बकऱ्या, दोन बकरे आणि चार पिल्लं. राका म्हणाला की आधी सगळे पोलीस निघून जाऊ दे, मग जा.
पोलीस गेले. चौकी उठली. मग भिका नवागडकडे रवाना झाला. नवागडला आपल्या घरात जायचं म्हणून मनात खूप आनंद होत होता. घरी गेल्यावर त्याला पाहून आसपासच्या सर्व भिकाऱ्यांना खूप आनंद झाला. कानीनं फडा आणून त्याची झोपडी झाडून दिली. एकाच डोळयानं सगळीकडे नीट बघत म्हणाली- पाहून घे, सगळं ठीक आहे का नाही ते.
- हो हो, सगळं आहे. गवताची चटई, गळा तुटलेली प्लास्टिकची बाटली, टिनाचा डबा.
मग कानी सांगू लागली- तो दोरा पळून गेला सुमादीला. तिथल्या बाजारात बसलं की जास्त पैसे मिळतात म्हणे! आणि लंगडा काय करतो माहीत आहे? दालीला हाकलून दुसरी एक बाई आणली.
- आणि तू?
- मला कोण घेणार बाबा! आधीच एक डोळा आंधळा, दुसराही गेला तर किती खर्च येईल? शिवाय अजून काही तितकी म्हातारी झाली नाही ना? म्हणून लोक भीक देत नाहीत, म्हणतात कष्ट करून खायला काय होतं? कमी करते का मी कष्ट? तोहरीपर्यंत एवढा रस्ता चालून जात नाही?
- हो नं.
- बापरे, किती बकऱ्या झाल्या रे?
- उद्याच विकायला घेऊन जाईन म्हणतो.
- आणखी एक बातमी आहे नवागडची.
- काय?
- राजेसाहेबांना सरकारकडून काहीतरी मिळालं म्हणे, खूप धूमधाम अन् खाणं-पिणं सुरू आहे. संध्याकाळी फटाके फोडणार आहेत.
- मजा आहे तुमची.
- नाही रे, हे लोक काय उष्ट्या पत्रावळीत काही अन्न टाकणारे आहेत का? काय मिळणार आपल्याला? त्या तोहरीच्या लालजींची आई मेली, तेव्हा जेवलो होतो. आठवतं? खूप पुऱ्या, कचोऱ्या....
- हो हो.
- कुठे निघालास?
- एकदा सुखचंदजींना भेटून येतो.
सुखचंदजी त्याला मेंढपाळ म्हणून कमी दर्जाचा मानत नसत. त्याची घृणा करत नसत. नवागडला आल्यापासून कोणीही भिक्याला विचारलं नव्हतं इतके दिवस कुठे होता म्हणून. त्याचं असणं-नसणं सारखंच! तो परतलाय हे कोणाच्या लक्षातच आलं नाही.
काय करणार? हे असंच होतं, होतच असतं. बकऱ्याचं मांस, दूध वगैरे लागलं की भिक्याला शोधायचं ते फुकटात किंवा स्वस्तात मांस व दूध घेण्यासाठी. एरवी तो कोणाच्या हिशेबी राहणार? शक्यच नाही. ही कहाणी खूप पुराणी, नवागडच्या मातीपेक्षाही पुराणी.
सुखचंदच्या शाळेला आज सुट्टी होती. तो वडाच्या झाडाखाली बसला होता. नवागडमधले गवळी खूप श्रीमंत. मोतीहार व भगत हे दोघे गवळी सुखचंदजवळ बसून काहीतरी ऐकत होते. तरुण वय असल्यामुळे सुखचंदलाही सांगण्याचा, बोलण्याचा खूप उत्साह. तो त्यांना काहीतरी समजावून सांगत होता. भिक्याला बघून म्हणाला- ये ये, भिका, कधी आलास?
- आज पहाटेच आलो सुखचंदजी.
- बरा आहेस ना?
- रामजींनी जसं ठेवलं तसा आहे. तुम्ही बरे आहात?
- हो, हो, ये, बस.
भिका भीतभीतच हसत हात जोडून दूर बसला. गवळयांच्या पायात जाडजूड चामड्याचे जोडे, कानात पितळी बाळया, हातात लाठी, डोक्यावर पगडी, त्यांची भीतीच वाटे भिक्याला, मोतीहारीनं भिक्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. सुखचंदजींना म्हणाला- पुन्हा एकदा सगळं नीट समजावून सांगा बरं सुखचंदजी.
- पहिल्यापासून?
- हो सगळं सांगा.
- सांगितलं की!
- पण नीट नाही समजलं. राजेसाहेबांच्या मालकीची जमीन घेऊन सरकारनं रेल्वेलाइन टाकली, बसचा रस्ता केला यात काय मोठंसं? हे तर होतच असतं. सरकार काय आकाशात रेल्वेलाइन अन् रस्ता तयार करणार आहे का?
- अगदी बरोबर आहे तुझं मोतीहार.
- मग राजेसाहेबांनी सरकारवर मामला कशाला केला, तेच मला समजत नाही.
- का नाही करणार? हे बघ, जमीन राजेसाहेबांची होती की नाही?
- हो, त्यात काय संशय? खूप खूप जमीन होती.
- हं, म्हणजे त्या जमिनीवर त्यांचा हक्क होता.
- हे काय सांगायला पाहिजे? हक्क तर होताच.
- हा जो स्वत:च्या मालमत्तेवरचा हक्क असतो ना, त्यालाच भारतीय कायद्याच्या घटनेत मूलभूत अधिकार म्हणतात. सात प्रकारचे मूलभूत मानवी अधिकार असतात. आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचे जे मूलभूत हक्क असतात त्यांचं रक्षण करणं हे घटनेचं कर्तव्य असतं.
- ताज्जब! म्हणजे `मूलभूत अधिकार' हा काही वाईट शब्द नाही म्हणायचा.
- कसा वाईट होईल? पण असा विचार तरी तुमच्या मनात का आला मोतीहारजी?
- नाही, म्हणजे ते शेतकरी लोक `मूलभूत अधिकार' म्हणत ओरडत होते म्हणूनच पोलिसचौकी बसवली होती नं?
- नाही, त्या वेळी कायदाभंगाचा व शांतताभंगाचा प्रश्न होता म्हणून पोलीस बोलावले होते.
- मग मूलभूत मानवी हक्क म्हणजे काय?
सुखचंद खूष झाला कारण आता त्याला आपलं ज्ञान दाखवण्याची संधी लाभली होती. हाताची बोटं मोजत तो म्हणाला- पहिला अधिकार समतेचा. जात- पात- धर्म वगैरे भेदभाव सोडून सर्व माणसांना समान मानायचं. या कारणावरून कोणावरही अन्याय व्हायला नको. हा पहिला मूलभूत मानवी हक्क.
- हे असं लिहिलेलं आहे कायद्यात?
- हो, स्पष्ट लिहिलं आहे.
मोतीहार पुरेपूर आत्मविश्वासानं नि गर्वानं म्हणाला- हे असं नक्कीच इंग्रजांनी लिहिलं असणार. जात- पात- धर्म भेद काही मानायचं नाही? म्हणजे मी आणि हा भिका मेंढपाळ समान?
- हो, कायदा हेच सांगतो.
- तरी हे झूटच आहे सुखचंदजी. सगळं स्पष्टच दिसतंय ना? अहो, जातीमुळेच तर या भिका मेंढपाळाला कोणीही वरच्या जातीचा माणूस घरात घेणार नाही, त्याचा स्पर्श झालेलं पाणी पिणार नाही. तुम्ही हे जे काय सांगताय ते नक्कीच कोण्यातरी दुष्मनाचं काम असलं पाहिजे. अहो, जवाहरजी पंतप्रधान होते, इंदिराजी होत्या तेव्हा तर आम्ही कधी असल्या भलत्यासलत्या गोष्टी ऐकल्या नाहीत! मेंढपाळाला नि ब्राह्मणाला एकसारखा मान दिल्याचंही कधी पाहिलं नाहीच.
सुखचंद चतुर आहे. तो कधी मधमाश्यांच्या पोळयावर दगड मारणं शक्यच नाही. शक्य तितक्या साध्या सरळ भाषेत तो स्वतंत्र भारतातल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणते ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.
आता तर भगतही म्हणू लागला- ही सगळी झूट बात.
- का असं म्हणता?
- हे पहा, ज्याचं जे काम असतं ते करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे की नाही?
- आहेच.
- मग मुसलमान जे खातो, जे काम करतो ते तो नवागडमधल्या कोणाला करू देईल? सुखचंद हसत म्हणाला- ऐका, मी संध्याकाळी प्रौढांना शिकवतो ना, तिथं तुम्ही या आणि इतरांनाही आणा, वाचायला शिकलात की तुम्ही स्वत:च वाचू शकाल.
- ते कसं काय जमणार या वयात?
- लिहिण्या-वाचण्याचं काय वय असतं?
- असतंच.
- यावर काय बोलणार मी? तुम्हाला जे ऐकायचंय ते ऐकून घ्या.
मोतीहार व भगत खूप एकाग्रपणे ऐकत होते. भिका तोंडाला कुलूप लावून गप्प बसला होता. मूलभूत अधिकाराच्या गोष्टी ऐकून गोंधळला होता.
मग मोतीहार म्हणाला- ती शेवटची गोष्ट, म्हणजे कोणाचीही खाजगी मालमत्ता कोणीही घेऊ शकणार नाही, हे चांगलं लिहिलं आहे.
- म्हणूनच राजेसाहेबांना सहा लाख रुपये मिळाले.
- सहा लाख?
भिक्याच्या चेहऱ्यावर या आकड्याचा काहीही परिणाम दिसला नाही. कारण सहा लाख रुपये म्हणजे नेमके किती रुपये याची त्याला काहीच कल्पना नव्हती. मोतीहार व भगत मात्र थक्कच होऊन गेले. सहा लाख रुपये!
सुखचंदला प्रायमरी शाळेतल्या शिक्षकाचा पगार मिळायचा, त्यामुळे त्याच्याही मनावर या आकड्याचा फारसा परिणाम दिसला नाही. तूर्त तो मूलभूत मानवी हक्क म्हणजे काय ते समजावून सांगण्यातच दंग होता. म्हणाला
- तेच तर सांगतोय. राजेसाहेबांचा त्यांच्या जमिनीवर हक्क होता. सरकारनं जेव्हा त्यांच्या जमिनीवर रेल्वेलाइन टाकली, बसरस्ता केला, तेव्हा राजेसाहेबांच्या मूलभूत अधिकाराला ठेच पोहोचली.
- कशी?
- अरे, परवानगी घेतली नाही. ती सरकारी जमीन आहे असं धरून चालले. तिथेच तर सगळा गोंधळ झाला ना?
- असं, असं, मग?
- मग काय, राजेसाहेब सज्ञान झाल्यावर त्यांनी केस केली.
- कोणावर?
- रेल कंपनीच्या पूर्व विभागावर.
- ती केस ते जिंकले?
- हो.
- हे चांगलंच आहे. संपत्तीवरचा मूलभूत अधिकार! वा! पण ती संपत्ती किंवा मालमत्ता म्हणजे फक्त जमीनच, असं नाही नं?
- नाही भगतजी. सांगतो. हे बघा, तुमची मालमत्ता म्हणजे तुमचं घर- गाईम्हशी- घरातल्या वस्तू, भांडीकुंडी वगैरे सगळंच. जशी माझी संपत्ती म्हणजे ही खाट, कपडेलत्ते आणि पुस्तकं. भिक्याची संपत्ती म्हणजे त्याच्या बकरे-बकऱ्या. स्थावर-जंगम सगळीच संपत्ती असते. ती कोणी हिसकावून घेतली तर भरपाई द्यावीच लागते.
- वा, समजलं. खूप समाधान वाटलं या गोष्टी ऐकून. उठून निरोप घेताना मोतीहार म्हणाला- आता लग्न करून टाका मास्तर, तुमच्या जातीची एक मुलगी आहे नवागडमध्ये. ते लोक शेतजमीन-गाईम्हशी-नांगर-सायकल वगैरे सर्व देतील.
- नको, नको.
- बरं, चलतो, सुखचंदजी.
ते लोक निघून गेले. भिका या सगळया नवीन गोष्टी ऐकून प्रभावित व उत्तेजित झाला होता. म्हणाला- सुखचंदजी!
- बोल भिका.
- तुम्ही जे सांगितलं ते सगळं खरं आहे? ते मूलभूत अधिकार की काय ते.
- अगदी खरं.
- मग शेतकरी नारे लावत होते तेव्हा तेसुद्धा हेच म्हणत होते नं?
- हो भिका.
- राजेसाहेबांची जमीन त्यांची संपत्ती?
- हो.
- आणि माझे बकरे-बकऱ्या माझी संपत्ती?
- अर्थातच.
- सरकारनं त्यांची जमीन बळकावली म्हणून कितीतरी पैसे दिले नं?
- हो.
- मग सुखचंदजी, माझे बकरे-बकऱ्या पोलीस बळजबरीनं उचलून नेतात! त्याच भीतीनं मी जंगलात पळून लपून राहतो. ते पोलीस माझे बकरे-बकऱ्या हिसकावून नेतात म्हणून मला तर कधी एक रुपयाही भरपाई मिळत नाही जी. सरकार या पोलिसांना मूलभूत अधिकाराच्या गोष्टी सांगायला विसरून गेलं की काय?
- नाही, ते लोक जुलूम करतात, भिका. हा अन्याय आहे.
- तर मग राजेसाहेबांना पैसे मिळाले कसे, फक्त बड्या लोकांनाच पैसे मिळतात का? दु:खानं हसत सुखचंद म्हणाला- प्रत्यक्षात तसंच होतं भिका; पण आपल्या कायद्याच्या घटनेत चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तेच सांगितलं मी.
- काय लिहिलंय ते आम्हांला काय कळणार, सुखचंदजी!
- राजेसाहेबांना पैसे मिळाले तेही खटला करून. कायद्यात हेही लिहिलंय की तुमचे मूलभूत अधिकार कोणी बळकावले तर खटला करता येतो.
-मी? मी कसा खटला करणार सुखचंदजी? मला काय कळतं त्यातलं? पोलिसांनी बकरे पळवले तर कोणी मेंढपाळ त्यांच्या नावे खटला करूच शकत नाही.
- हं, पण त्याला हा अधिकार आहे. कायद्यानं अधिकार दिला आहे.
- पण पैसे कुठे आहेत? हिंमत कुठे आहे एवढी? त्या मूलभूत हक्काच्या गोष्टी मला काही समजत नाहीत सुखचंदजी. त्यानं काही कामं होत नाहीत.
- तेही खरंच! मी तरी काय सांगणार तुला... सुखचंदच्या चेहऱ्यावरची असहायता व गोंधळ बघून भिक्यानंच त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. म्हणाला- तुम्ही काय करणार जी? जगात जे चालत आलंय तेच चालत राहणार, नाही का?
- तसं नाही रे, भिका. जे लिहिलं आहे ना, तेच बरोबर आहे. ते अमलात येऊ शकत नाही खरं; पण त्यातही आपली चूक आहेच. हे आपलंही काम नाही का?
- मला काही समजत नाही जी. ते मोतीहारजी अन् भगतजी, बाप रे! किती गाई-म्हशी त्यांच्या मालकीच्या! त्यांना खूप समजतं. ते म्हणाले ते बरोबरच आहे. जात-पात कधी समान असते का?
सुखचंद स्वत: भिक्याच्या हातचं अन्न खाण्याची कल्पनाही करू शकत नाही; पण तरीही त्याला वाटतंय की जातीपातीवर, स्पृश्यास्पृश्यतेवर त्याचा विश्वास नाही. कारण पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं की जात-पात, शिवाशिव वगैरे सगळं झूट आणि सुखचंदचा छापील अक्षरांवर खूपच विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर तो या गावठी लोकांच्या समजुतींवर टीका करतो. खरंतर जवाहरजींचाही या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि इंदिराजींचाही.
त्यामुळे शिवाशिव, अंधविश्वास होता, आहे आणि राहीलही, नाही का? ती तर ईश्वराची निर्मिती. रामजींनीच तर कोणाला ब्राह्मण तर कोणाला मेंढपाळ बनवलं. त्यामुळे जातीभेद राहणारच. भिका म्हणाला- ते टाहाडचे पुजारी हनुमान मिश्रजी तर सच्चे ब्राह्मण होते ना? ते मेंढपाळाच्या सावलीलाही उभे राहत नसत. प्रत्यक्ष विश्वनाथ महादेवाशी त्यांची बातचीत! देव काय म्हणतात ते त्यांना तर माहीतच आहे.
सुखचंद नाइलाजानं विषय बदलत म्हणाला- बरं भिका, कसा होतास इतके दिवस?
आता भिक्याचा चेहरा एकदम उजळला. हसत म्हणाला- खूप मजेत होतो. इतकं चांगलं राहता येईल असं कधी वाटलं नव्हतं आणि सगळयात चांगली गोष्ट म्हणजे दहा बकरे-बकऱ्या झाल्यात.
- दहा? काय म्हणतोस?
- हो जी, दोन बकरे तर चांगले जवान झालेत. पंधरा-सोळा शेर मांस भरेल. बाजारात आठ रुपये शेर भाव आहे मांसाचा. समजा सहा रुपया शेरानं विकलं तरी...
- तरी दोन बकऱ्यांचे दोनशे रुपये मिळतील.
- दोनशे?
- हो भिका.
भिक्याच्या डोळयांत पाणी भरून आलं. म्हणाला- तुमच्या आशीर्वादानं असंच होऊ द्या, सुखचंदजी. दोनशे रुपये मिळाले तर माझी सगळी दुर्दशा संपून जाईल.
- कशी रे?
- काय सांगू जी? लग्न करता येईल, स्वत:चा संसार थाटता येईल. आमच्या मेंढपाळांच्या बायका चांगल्या कष्टाळू असतात. बकरे-बकऱ्या सांभाळत आनंदात निघून जातील दिवस. कुठेतरी एखादी झोपडी बांधीन, भांडीकुंडी घेईन, जसा असतो संसार!
- तू कुठे राहतोस, भिका?
- त्या बिजूपाडाच्या पलीकडे.
- कोणी नातेवाईक नाहीत?
- नाही.
- सगळं मनासारखं होऊ दे, भलं होवो तुझं- सुखचंदनं मनापासून शुभेच्छा दिल्या. भिका आपला कोणीतरी अगदी जवळचा आहे असं वाटून गेलं त्याला.
- निघू मी, सुखचंदजी?
- ये.
- आज फटाक्यांची आतषबाजी होणार आहे म्हणे!
- ऐकतोय खरं.
भिका घराकडे निघून गेला. मन कसं प्रसन्न झालं होतं त्याचं. बकरे-बकऱ्यांना कवटाळून त्यांचे खूप लाड करावेसे वाटत होते. पोलिसांनी नकळत त्याच्यावर उपकारच केले होते म्हणायचे- कारण नवागडला पोलिसांची छावणी बसली नसती तर तो राढाला पळून गेलाच नसता ना? राढाला गेला म्हणूनच तर राकाची मदत मिळाली आणि त्यामुळेच तर वाढता वाढता दहा बकरे-बकऱ्या झाल्या. रस्त्यात भिक्यानं कणीक, मीठ, मिरची, वाळलेल्या अळकुड्या वगैरे विकत घेतल्या. लालजींना विचारलं- बरे आहात ना, लालजी?
लालानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. त्याच्याकडे रामधारी नावाचा एक ठेकेदार आला होता त्याच्याशी बोलण्यातच तो गर्क होता. सामान विकत घेताघेता भिक्यानं ऐकलं की फटाके `शूरमहाल' समोरच्या मैदानात फोडण्यात येणार आहेत. संध्याकाळी. पाच हजार रुपयांचे फटाके! ही बातमी ऐकून त्यानं ठरवलं की संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी बघायला जायचंच. त्यानं कपडे धुवायचा एक साबणही घेतला. साबणानं कपडे स्वच्छ धुणार होता तो.
घरी गेल्यावर तो अळकुड्यांचं कोरड्यास आणि गरमगरम रोट्या बनवणार होता. त्यात आजचा आणि उद्याचा दिवस सहज निघून जाईल. दोनशे रुपये! त्या लंगड्याला जर आणखी एक बाई मिळू शकते तर भिक्यालाही बायको मिळूनच जाईल! त्यानंतर कदाचित थोडीफार जमीनही मिळून जाईल. लग्न केलं की नातेवाइकांचा एक समाज मिळेल. तेही मदत करतील. एकट्याच्यानं कायकाय होणार? राढा-टाहाड-वाढाव वगैरे गावातल्या माणसांची मदत मिळाली तर मनाला धीर वाटतो.
भिक्यानं कपडे धुतले. रांधण्यात बराच वेळ गेला. जेवण होईपर्यंत संध्याकाळ होत आली. त्यानं बकरे-बकऱ्या मोजून बसमध्ये चढवल्या आणि त्यांच्यावर झाकण टाकणार तोच ते आले.
राजेसाहेबांचे दोन पोलीस.
पोलीस?
भिका भयभीत होऊन झाकलेल्या शेळया पाठीशी घालून उभा राहिला. हा काय प्रकार? पोलिसांची छावणी नव्हती, पोलीस नव्हते म्हणूनच तर नवागडला परत आला होता तो. अचानक कुठून उगवले हे पोलीस?
- काय भिक्या, घाबरलास की काय?
फिदीफिदी हसत गजानन नावाचा पोलीस बोलला. त्याच्या तोंडाला दारूचा भपका.
- चल, दोन बकरे काढ, राजेसाहेबांनी अख्ख्या ठाण्याला आमंत्रण दिलंय. एवढं मांस कुठे मिळणार?
- नाही साहेब, बकरे नाहीत.
- मग बकऱ्या काढ.
- असं नका करू शिपाईजी, पाया पडतो तुमच्या, यांच्या भरवशावरच जीव जगतो माझा.
- चल, भाग साल्या...!
गजानननं एक जोरदार कानफडात मारली भिक्याच्या. नाकाचं चामडं व ओठ फुटून रक्त वाहू लागलं. भिक्या तरीही प्राणपणानं ओरडत होता- पोलिसांच्या भीतीनंच मरतो आम्ही, पळून गेलो होतो राढाला. नका घेऊ शिपाईजी, दया करा....
ते पोलीस सरळ बकरे उचलून चालू लागले असते. का नाही नेणार? त्यांना कोण अडवणार? राजेसाहेबांनी बोलावलं म्हणूनच पोलीस आले नं? मग ते काय गोस्त विकत घेऊन खाणार की काय? संतापून म्हणाले.
- साल्या भिक्या, तू राजेसाहेबांच्या मुलुखातच राहतो नं? चल भाग...
भिका हे अचानक ओढवलेलं संकट बघून पागल होऊन गेला. बिथरून म्हणाला
- या बकरे-बकऱ्यांवर माझा तसाच हक्क आहे जसा राजेसाहेबांचा त्यांच्या जमिनीवर, त्यांची जमीन बळकावली म्हणून त्यांना पैसे मिळाले. मी का माझा हक्क सोडावा?
- काय? काय बोलतो तू साल्या मेंढपाळा... कोणाशी बरोबरी...
त्या शिपायांनी मग भिक्याला यथेच्छ झोडपून काढलं. सरकारी परवाना असलेला निपुण व सराइत हातांचा मार तो! थांबता थांबेना आणि मारतामारता वक्तव्य
- अरे गजानन, ऐकतो आहेस नं? त्या कुळांनी उठाव केला तेव्हा साल्या या दळभद्र्या लोकांना हक्क-बिक्क शिकवले बरं? अरे पोलीस बकरे खाणार नाहीत तर कोण खाणार रे? बोल! हक्क म्हणे! अरे, हा तर दुसरा राजासाहेबच होऊन बसला नवागडात. राजेसाहेबांचा जसा जमिनीवर हक्क तसाच याचा त्याच्या बकऱ्यांवर हक्क म्हणे!
मारूनमारून रक्तबंबाळ झालेल्या भिक्याला लाथेनं ढकलून त्यांनी बकऱ्यांवरचं पांघरूण काढलं आणि दोन बकरे व दोन बकऱ्या घेऊन जल्लोष करत निघून गेले.
भिका जनावरासारखा ओरडत होता, तडफडत होता. त्याला जागेवरून हलताही येत नव्हतं. फसवणूक झाल्याच्या दु:खानं आणखीच रडू कोसळत होतं. खोटं, सगळं खोटं! सुखचंदजींच्या सगळया गोष्टी खोट्या. बकऱ्यांवरचा त्याचा हक्क हा मूलभूत अधिकार? आपल्या संपत्तीवरचा अधिकार हा सातवा मूलभूत अधिकार आहे नं? मग हा अधिकार कोणी हिरावून घेऊ नये याची काळजी का घेत नाही कायदा? सगळं, सगळं झूट! भिक्याचा मूलभूत मानवी अधिकार वारंवार का हिरावून घेतला जातो? राजेसाहेबांना भरपाई मिळते, भिक्याला का नाही मिळत? राजेसाहेबांना भरपाई म्हणून सहा लाख रुपये मिळतात आणि भिक्या मेंढपाळाला मात्र मूलभूत अधिकार असूनही भरपाई तर नाहीच; पण साधं संरक्षणही मिळू शकत नाही?
अंगावर कोणाची तरी थंड सावली पडली. कानी आणि लंगडा आले होते. लंगड्याच्या त्या दुसऱ्या बाईनंच भिक्याला कसंतरी धरून तिथून सरकवलं. चिंधी भिजवून त्याच्या अंगावरचं रक्त पुसलं. कानीनं चेहऱ्यावरचं रक्त पुसलं. लंगडा म्हणाला- थोडं पाणी पी, भिक्या.
लंगड्याची बाई म्हणाली- मी चुना घेऊन येते. चुना लावला की रक्त थांबतं, ठणकाही थांबेल. ते तीन भिकारी भिक्याची शुश्रूषा करत होते. जखम भरून, उठून उभं राहायला भिक्याला दहाबारा दिवस लागले. मग तो म्हणाला- चल लंगड्या, ही पिल्लं विकून टाकू. जे मिळेल ते मिळो!
वीस रुपयात चार पिल्लं विकून टाकली भिक्यानं. त्याची मोडलेली कंबर सरळ होत नव्हती. चेहऱ्यावर वेडेवाकडे वण राहूनच जाणार होते, मूलभूत अधिकारासाठी दिलेल्या पहिल्या व शेवटच्या लढ्याची चिन्हं म्हणून! डोक्यावरच्या जखमा वाळल्यावर सगळे केस भादरून टाकावे लागणार होते.
- आता तू काय करशील रे, भिक्या?
- भीक मागत फिरीन.
- भीक?
- हो.
- नाही रे, चांगला धंदा करून जगणारा तू.
भिक्यानं काही न बोलता त्यांना तीन तीन रुपये दिले. लालाच्या उधारीचे सहा रुपये दिले. बकऱ्या बांधायच्या दोरीची किंमत म्हणून मोतीहारच्या नोकराला दोन रुपये दिले. तीन रुपये कडोसरीला खोचले. झाडाची फांदी छिलून एक काठी बनवली. तोहरीच्या बाजारातून भिक्षापात्र म्हणून टिनपाटाचं एक वाडगं विकत घ्यायचं ठरवलं. सहासात आण्याला किंवा एका रुपयाला जसं मिळेल तसं.
सुखचंद त्याला बघून माडीवरून खाली उतरला. घडलेली घटना त्याला कळलीच होती.
- भिका....
- जातो, सुखचंदजी.
- कुठे? कुठे जातो भिका?
- जिथे भीक मिळेल तिथे.
- भीक? भीक मागणार तू?
- हो, सुखचंदजी.
- पण तुझ्या अंगावर तर अजूनही...
- हो महाराज; पण काय करणार तुम्ही सगळं झूट सांगितलं आम्हांला. मला तर काहीच मूलभूत अधिकार नाहीत. फक्त राजेसाहेबांना आहेत. येतो मी...
काठीचा आधार घेत चालू लागला भिका मेंढपाळ हळूहळू. तो आता भिकारी झाला होता. पोलीस दिसले तरी त्याला भीती नव्हती. निर्भय झाला होता तो. बकरे-बकऱ्या, जमीनजुमला, भांडीकुंडी असली तरी पोलिसांना भ्यावं लागतं. जंगलात पळून जावं लागतं. तसा कोणी मेंढपाळ दिसला तर पोलीस त्याला मारणार आणि जे असेल ते हिसकावून घेणार; पण कफल्लक रंक मेंढपाळाला पोलीस कशाला मारतील? भिक्याला आता वाटू लागलं की ही गोष्ट त्याला आधीच का नाही समजली? या मातृभूमीत जर एखाद्या मेंढपाळाला राजेसाहेब, लालाजी, पोलीस, हनुमान मिश्र वगैरे लोकांच्या सदिच्छा घेऊन जगायचं असेल तर लाचार होऊन भीक मागणं हा एकच मार्ग असतो. जे मेंढपाळ भिक्यासारखे आपल्या मातृभूमीत माणसासारखं जगायचा प्रयत्न करतात त्यांच्यावरच तर या लोकांचा राग असतो.
आता तर भिक्याला आपण एकटे आहोत असंही वाटत नाही. भिकारी कुठे नसतात? कानी, लंगडा यांच्यासारखे भिकारी सगळीकडे असतात. आता भिक्या एका मोठ्या, चांगल्या विशाल समाजाचा सदस्य झाला.
सुखचंद त्याच्याकडे बघत राहतो आणि विचार करतो की या भिक्या मेंढपाळाला सात नंबरचा मूलभूत मानवी अधिकार मिळू शकला नाही; पण तीन नंबरचा अधिकार मात्र मिळाला. स्वातंत्र्याचा अधिकार! स्वेच्छेनं कुठलाही धंदा उपजीविकेसाठी निवडण्याचा अधिकार. भिक्यानं स्वेच्छेनं भिक्षावृत्ती स्वीकारली. आता जो जन्मभर भिकारी म्हणून जगू शकेल. याची काळजी भारतीय संविधान घेईल; पण त्याला जर जास्त वरच्या दर्जाचं जीवन व उपजीविकेचं साधन कोणी देऊ केलं तर? तर त्याच्या मूलभूत अधिकारावरचा हा हस्तक्षेप भारतीय कायदेव्यवस्था मुळीच सहन करणार नाही. भारतात कुठेही अन्याय होताना दिसला तर कायद्यानुसार तेथे पोलीस, रिझर्व पोलीस, सशस्त्र पोलीस, मिलिटरी, टँक्स, लढाऊ विमानं वगैरे सर्व पाठवलं जाईल.
भिक्या मेंढपाळ पाय खुरडत खुरडत वळणावरून दिसेनासा झाला. आता हरवण्यासारखं त्याच्यापाशी काहीच उरलं नव्हतं.
- महाश्वेतादेवी
अनुवाद - वीणा आलासे
कोलकत्ता
लहिलेली कथा आहे. याबाबतीत त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या : ``मी फक्त भाषाशैली, घाट, सौंदर्य याच गोष्टींना साहित्याचे निकष मानतच नाही. विशाल इतिहासाच्या परिघात आपल्या भोवतीचं वर्तमान नेमकं कोणत्या टप्प्यावर आहे ते अजमावण्यासाठी कथेच्या आशयानुसार कधी महाकाव्ये, पौराणिक कथा, लोककथा, समजुती, चालीरीती, विदग्ध काव्ये इत्यादींच्या अनुषंगाने लेखन होत जाते. खरा डोळा असतो तो वर्तमानावरच. याच प्रक्रियेतून मला जाणवू लागतं की जातीभेद, वर्णभेद, जमीन-पाणी- जंगलावरील अधिकार आणि याबाबतीत सत्ताधारी वर्गाने अविरत चालू ठेवलेले समाजमान्य शोषण हासुद्धा एक इतिहासच आहे. कधीकधी वाटू लागतं की या इतिहासाच्या परिघात कधीच प्रवेश न करू शकलेला एक संपूर्णपणे बहिष्कृत समाज आहे. ही माणसं समाजाच्या मूलस्रोतात तर नसतातच; पण इतिहासातही नसतात, ध्यानीमनीही नसतात. त्यांना भूतकाळ, भविष्यकाळ तर नसतोच; पण वर्तमानही नसावा?
आणि ही अशी माणसं आपल्या अवतीभोवतीच असतात. कुठल्याही रेल्वेस्टेशनपाशी किंवा आजकाल मोठमोठाले पूल बांधले जात आहेत त्या पुलांखाली जाऊन पहा; पण आपल्या लेखीच नसतात ती! त्यांनाही आत्मसन्मानानं जगण्याची इच्छा असते, त्यांचेही काही मूलभूत मानवाधिकार असतात. कारण तीही माणसंच असतात हे आता आवर्जून सांगण्याची वेळ आली आहे. त्यांचा कुठेच काही रेकॉर्ड नसतो हे कसं काय?
आंधळया समाजाची ही विवेकशून्य निष्ठुरता, धनदांडग्यांची बळजोरी, प्रशासनातला भ्रष्टाचार, पोलिसांची सत्ताशरण हिंस्रता, उच्चवर्णियांची संवेदनहीनता या सर्व वृत्ती आपण जन्मजातच श्रेष्ठ आहोत या समजुतीत असते. त्यामुळेच भिका मेंढपाळासारखी निरुपद्रवी पण कष्ट करून जगू पाहणारी माणसं रस्त्यावर येतात. त्यांचे किमान मूलभूत अधिकारही नाकारले जातात. शेवटी भिकेला लागतात.
हे सत्य जितकं सरळ असतं तितकीच ही कथाही सरळ, स्पष्ट आहे. ज्या माणसांना सन्मानानं जगण्याचे सर्व दरवाजे बंद होऊन जातात त्यांना बघत आपण गप्प राहायचं? मग हे दरवाजे उघडणार कोण? आणि दरवाजे उघडायचे असले तर सरळ धडक मारावी लागते, आडवळणानं जाऊन चालत नाही. पत्रकारिताही अशीच असायला हवी की नको?
शेवटी एक गोष्ट मात्र सांगून टाकते, की या राजेसाहेबांसारख्या धनदांडग्यांची, सत्ताधाऱ्यांची, पोलिसांची आणि स्वत:ला फार शहाणे समजणाऱ्या लोकांची कथेच्या माध्यमातून टिंगलटवाळी करताना मनातून मला आनंद होतो. माणसाला माणसासारखं जगू न देणाऱ्या माणसांना आपण नष्ट करू शकत नाही; पण निदान त्यांचं बिंग तर फोडू शकतोच ना?
समाज कधीकाळी मानवाधिकारांवर निष्ठा ठेवून कायद्याचा वापर करण्याच्या दिशेने जाणार असेल तर माझ्या कथेतील पत्रकारीशैलीचा तो विजयच ठरेल.''



viagra
sjejsc viagra EGTizr order tadalafil 9420 viagra DLuJS buying cialis online izMlG cialis ixvjMo viagra 2384
Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
Canada Goose Chilliwack store
Canada Goose Chilliwack store is a supplier online of the Canada Goose Jacket such as Canada Goose Parkas,Canada Goose Coat,Canada Goose Gloves etc.The Canada Goose Online store supply the products with excellent quality,discount price,good service,fast delivery as well as free shipping.
Welcome to our store! Cheap Men's Goose Expedition Parka, Men's Goose Yorkville Parka,Women's Goose Chilliwack Parka and Women's Goose Trillium Parka on sale are waiting for you.Just take action as soon as possible.
Prada Handbags is now known worldwide for its luxurious designs and first class quality,with stores located in practicaly every country.Prada Bags is famous for using a lot of crunchy polyester in their designs, as well as nylon and a few other synthetic fibers.Prada Fairy Bag is a simple bag as well as Prada Ostrich Veins Bags ,to be sure — but if you’ve been observant enough to notice the Prada Lizard Veins Bags ,then you have no doubt seen that all of these ridiculously affordable Prada Bag are pretty simple.I think that this is a good “Prada Tote Bag ” let’s say.Prada Handbag is simple, the lines of Prada Cowhide Leather Bags are clean,Prada Handle Leather Bags are well made, and there’s no doubt that it is stylish for Prada Nappa Leather Bags . It isn’t flashy, it definitely isn’t ostentatious, and it is pretty much the definition of an uncomplicated Prada Crocodile Veins Bags .That being said, I think Prada Bandolier Bags are perfect for someone who’s never had a Prada Designer Bags before. In fact, if you’ve never had any kind of designer Prada Nylon Bag before,then this one is a really good place to start.Christmas is coming,and those of us who are very,very lucky may be getting one of the many beautiful Prada Handbags that will look particularly becoming during the winter months. Strictly in the hopes of making sure this happens for some of you.Our Prada UK online store provide all kinds of Cheap Prada Bags just like Prada Perforated Leather Bags ,Prada Canvas Bag,Prada Printed Leather Bags ,Prada Leather Bag,Prada Python Veins Bags and Prada Saffiano Bags for your selection.this Discount Prada Handbags are provided with Free Shipping in UK.furthermore,Prada Sale with Great Discount now!
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote or maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet wanted following types of the Mulberry Satchel include things like Mulberry Shoulder Bag, Mulberry Holdall, Mulberry Briefcase and also numerous much more.The Mulberry Messenger Bag which has attained essentially the most appropriate position might be the Mulberry Purse. The Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer Mulberry Store which deliver an enormous assortment on the very well-liked Mulberry Sale.
p>Canada Goose Parka(also
p>Canada Goose Parka(also known as Canada Goose Expedition Parka)is a branded cold weather outerwear.Canada Goose Jackets fills its coats with a blend of goose and duck down to ensure warmth and Canada Goose Coatsalso use coyote fur on the hoods.Canada Goose Jackets Uk,are known to be a highly fashionable garment now.Canada Goose Jacketalso created a custom range which includes Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Snow Mantra Parka,Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Yorkville Parka for men and women.other hot selling Canada Goose Parka Uk such as Womens Canada Goose Solaris Parka,Womens Canada Goose Trillium Parkaand Canada Goose Glovesfor your selection.Wherever people need protection from the elements, top quality and iconic style, you’ll find Canada Goose Jacket Uk.It will likely be your best choice to purchase Canadian Goose Jacket Uk from our Canada Goose UK online store.From now on,you can own your best Canada Goose Clothing on the web with the most attractive selling price here! Canada Goose Sale with Free Shipping and Great Discount in our Canada Goose UKShop now!
Belstaff Jacken,Belstaff Outlet ,Belstaff Gangster ,Belstaff Lederjacke
http://www.belstaffjacken-outlet.com/
Belstaff is one of the largest clothing companies in the world, delivering top quality jacket, shoes, boots and travel bags, with its famous reputation and high sales.The products of Belstaff Outlet are made up of a fine quality of leather and caters the travel needs of the people marvelously. There is no need to miss your stylish look because Belstaff Outlet Store provides all the Belstaff Jacken in latest designs and colors that you will love it at the first sight.
When mentioned Belstaff Jacken Günstig,most people will think about Belstaff Herren Jacken at once. On our Belstaff Shop,you can see more fashion and stylish design of Belstaff Jacken Herren like Belstaff Brad Jacken,Belstaff Hero,Belstaff Gangster.Then in the winter, Belstaff Jacken Damen are hot sale new.The epitome of rugged,authentic cool,womens Belstaff Winterjacken have been making exceptionally designed outerwear since 1924,earning a cult following among everyone from film stars to road warriors.Then if you are looking for Belstaff Taschen,we also have stocks.And Belstaff Shoulder Bag is a famous Hollywood star favorite.Not only work fine,but durable,hard-working technologies and equipment.
We know that Belstaff Outlet Düsseldorf are most famous for Belstaff Lederjacke,and the leather is really of high-quality.You can buy a custom Belstaff Lederjacken Damen from our store.If you oder now our Belstaff Fabrikverkauf will promise you free shipping.
Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!
As we all know,mens do care
As we all know,mens do care Luxury Watches like Swiss Rolex or Omega De Ville very much,because wear branded watches such as Rolex Watches UK and seiko credor can show their distinguished status and good taste,but not everyone can affort it,don’t worry,Here we highly recommend Replica Watches UK especially Replica Ladies Rolex Watches and Replica Rolex to you at low price.you can buy Luxury Watches Replica UK for example Cartier Ballon Bleu in our Replica Watches online store with free shipping,furthermore,we offer great discount in Replica Rolex Watches,Fake Watches UK that is, Buy high quality Designer Watches especially Rolex Watches For Sale here with up to 50% off now.In addition,Rado Ceramica and Oris Watches are also your good chioce.Take Action now!
viagra
xnenugq http://huathw.com/ dwntxjf [url=http://ralrga.com/]dwntxjf[/url]
pqweuvn
vqopuapd
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!gmat practice test gre practice test lsat practice test act practice test buy google plus ones sat practice test cdl practice test cfa practice exam pmp practice exam usmle practice test
Belstaff Jacken Belstaff in
Belstaff Jacken
Belstaff in the Midlands.The Belstaff Jacken’s logo is a portrait of a Phoenix which symbolizes the continuity whether in the good times or the bad times. Belstaff Lederjacke interprets this spirit sufficiently.
Belstaff specialised in making technical garments wind-proof, rain-proof and resistant to heavy friction.Both Belstaff Damenand Belstaff Herren are specialised in garments for aviators, bikers, army and for anyone living an active life outdoors. Together with protective clothing it also make Belstaff Taschen and Belstaff Stiefel. Motorcycle Jacket - the best selling waterproof jacket were produced annually.The Belstaff Outletare great.
The Belstaff Lederjacken in our Belstaff Online Store are on a huge discount now. Both Belstaff Lederjacke Damen and Belstaff Lederjacke Herrenare in hot sale.
Belstaff Jacken Outlet is the only garment producing high technology jackets in 100% natural fabrics.Welcome to enjoy Belstaff Online.
..
Barbour Jackets Women,Barbour Sale,Barbour International
http://www.barbourjackets-women.net/
Barbour is a world-famous top brand.Barbour Clothing is a modern brand offering a complete wardrobe of beautifully-made,classically-designed,functional clothing.The Barbour Coat is renowned in the fashion industry for being a clothes designer that makes timeless pieces.
Contemporary brands are currently driving the fashion industry forward with their fresh ideas and original designs.The popular Womens Barbour Jacketshave been updated and now offers a range of a lighter weight quilt or waterproof nylon.Mens Barbour Jackets sale top quality Barbour Quilted Jacket,Barbour Ladies with cheap price for you.Among Barbour Stockists,the most popular are Barbour Quilted Jackets and Barbour International jackets,especialy fo oung people.Then Girls Barbour Jackets are appropriate for Young girls,elegance and fascinating.Barbour Jackets Sale is famous for producing waterproof coat in Britain.Then Boys Barbour Jackets are also the best-seller among fashionists.One who can not only make herself fashion but also her children with Cheap Barbour.
Our Barbour Salethe newest products of Cheap Barbour Jackets.Right here you may obtain an enormous amount of many Barbour Jackets at acceptable price.If you want to be a fashionist,a Barbour Jacket is must-have.And if you want to be outstanding among the crowd,Barbour Ladies Jackets are your good choice.And now,our Barbour Outlet sale Barbour Coats with free shipping and no sale tax,welcome to buy one and own it!