समानतेसाठी हेही का नाहीत?
दोन महिन्यांपूर्वी लोकसत्ताच्या `चतुरंग' पुरवणीत `समानतेसाठी आम्ही !' या शीर्षकाखाली प्रतिक्रियांवर आधारित दोन लेख प्रसिद्ध झाले होते. ते लेख तुम्ही वाचलेत का? `आमच्या घरात समानता कशी पाळली जाते', `नवरा कामात कशी मदत करतो', वडिलांनी उच्च शिक्षण देताना मुलगा-मुलगी भेद कसा केला नाही'... साधारपणे या स्वरूपाच्या त्या प्रतिक्रिया होत्या. या प्रतिक्रिया `लोकसत्ता'च्या अंकांत `जाहीर आवाहन' करून मागवण्यात आलेल्या होत्या. सामाजिक सुधारणा या मंुगीच्या पावलाने (का होईना, पण) हातात, हा दिलासा बहुतेक प्रतिक्रियांतून मिळत होता.
मला काही वेगळी निरीक्षणं नोंदवायची आहेत. या प्रतिक्रिया वाचताना सहज मनात विचार आला तो `जाती'चा. (भारतात `जात' हे वास्तव नाकारता येत नाहीच.) प्रतिक्रिया पाठवणाऱ्यांच्यात `राणे', `साळुंके' यांसारखं एखादं नाव अगदी भिंग डोळयासमोर धरून शोधलं तर सापडत होतं, नाही असं नाही. पण चितळे, गोगटे, भागवत अशीच बहुतेक नावं होती. हे मी उपहासाने लिहित नाही. ब्राह्म समाजात काही प्रमाणात का होईना, पण स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हे त्यामुळे लक्षात येत होतं.
पण ही स्थिती फक्त ब्राह्मण जातीतच आहे का? महाराष्ट्नत मराठाच नव्हे तर अन्य अनेक ब्राह्मणेतर जातीतले कितीतरीजण मला ठाऊक आहेत, जे बायकोला ती नोकरी करत असल्यानं घरकामात मदत करतात. तिचं स्थान मान्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्या स्त्रिया बोलताना मनमोकळेपणाने हे कबूलही करतात. आपल्या बहिणींना, मुलींना उच्च शिक्षण देताना त्या `मुली' आहेत हे त्यांच्या गावीही नसते. (किंवा `गावी' असलं तर ते `गावी'च सोडून ते शहरातलेले असतात.) गावाकडल्या जुन्या नातेवाईकांच्यात अजूनही सरंजामशाहीचा न जळलेला पीळ शिल्लक असल्यामुळे त्या जोडप्यांमधील पुरुषाच्या वाट्याला त्यानं या पद्धतीनं बायकोला घरकामात मदत केल्यानं उपहास, थट्टा येतच असणार, हे उघड आहे. त्यामुळे त्याला आणि तिलाही काहीसं अवघडलेपण वाटत असणार, हेही उघड आहे. पण चतुरंग पुरवणीतल्या दोन्ही लेखांत या पद्धतीचे अनुभव कुणीच लिहिले नव्हते. तसे ते छापून आले असते तर समानतेची अवघड वाट चढून जाणाऱ्या इतर समानधर्मी आणि समानजाती मंडळींना ते अनुभव नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले असते. पण तसं घडलं नाही. त्यांच्यापैकी कोणत्याच स्त्री-पुरुषांना का लिहावंसं वाटलं नाही?
`दै. लोकसत्ता'चा खप काही लाखात आहे. महाराष्ट्नतील सर्व जिल्ह्यात तो जातो. गावागावात जातो. असं असताना ब्राह्मण समाजातील लोक सोडता कुणालाच आपले समानतेचे किंवा असमानतेचे अनुभव व्यक्त करावेत असं का वाटलं नाही? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्नत शिक्षणाचा सर्वदूर प्रसार झालेला आहे. आपल्या कन्येनं शिकावं, पुढे जावं असं वाटणारं एक तरी कुटुंब प्रत्येक गावात असेलच की नाही? या कुुटुंबातल्या मुलीला, स्त्रीला किंवा पुरुषाला आपले अनुभव आणि त्याच्या अनुषंगाने येणारे विचार लोकसत्ताच्या व्यासपीठावर का मांडावेसे वाटले नाहीत?
हे झालं हिंदू समाजातील जातीजमातींबद्दल. त्याखेरीज नवबौद्धांच्यात खूप स्त्रिया शिकलेल्या आहेत. प्रज्ञा लोखंडे, उर्मिला पवार यांसारख्या लेखिका सकस लेखन करताना आढळतात. वसईकडील िख्र्चाश्न समाजाचं मराठी भाषेवर मनापासून प्रेम आहे. त्यांच्यातही सिसिलिया कार्व्हलोसारखी लेखिका आहे. मुस्लीम समाजातील रझिया पटेल लिहिते. लेखिका लिहितातच. पण त्या त्या समाजातील सर्वसामान्य स्त्री-पुुरुषांना अशा छोट्या छोट्या व्यासपीठांचा वापर करावा असं का वाटत नाही? त्यांच्या न लिहिण्यामागे काय कारण असावं?
एक उदाहरण देतो. अलीकडे मी अहमदनगरच्या यशवंतराव गडाखांचं `सहवास' हे पुस्तक वाचलं. त्यांनी लग्नाच्या सुरुवातीच्या काळात बायकोशी बोलणंच सोडलेलं होतं. शहरात राहून आणि ब्राह्मण आणि िख्र्चाश्न समाजातला मोकळेपणा पाहून त्यांना आपली खेड्यातील बायको `अडाणी' वाटू लागली होती. तिला बराच काळ हकनाक ही शिक्षा भोगावी लागली. यशवंतराव प्रसंगी अगदी जेवणाचं ताट फेकूनही आपल्या संतापाला किंवा घुसमटीला वाट करून द्यायचे. आपली चूक उमगल्यावर मात्र यशवंतरावांना या साऱ्याच वागण्याचा पश्चात्ताप झाला. हा अनुभव त्यांनी `सहवास'मध्ये नोंदवलेला आहे. आपला हा अनुभव त्या काळातल्या शिकलेल्या पिढीच्या मराठा तरुणाचा `प्रातिनिधिक' अनुभव होता, असं यशवंतराव लिहितात. मराठा समाजातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणावर शिकलेल्या नसल्यानं उच्चशिक्षित `रोमॅन्टिक' तरुणांना कमी शिकलेल्या वा न शिकलेल्या तरूणीशी लग्न करावं लागे. आताच्या पिढीचे जे कोणी यशवंतराव गडाख असतील, त्यांचा (किंवा अशाच एखाद्या शारदा गडाखांचा) अनुभव पत्ररुपात एवढ्या मोठ्या पूर्णपानी दोन लेखांत का लिहिला गेला नसेल?
आणखी एक जाणवलेली गोष्ट अशी. पश्चिम महाराष्ट्नतील एकही पत्रलेखक वा पत्रलेखिका नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड यांसारख्या गावांत स्त्री-पुरुष समानता नाहीच की काय? कदाचित त्यामुळेच गर्भजल परीक्षा आणि स्त्री गर्भाची हत्या यांत पश्चिम महाराष्ट्न् अख्ख्या भारतात आघाडीवर असावा. स्त्री शिक्षणाचा आणि एकूणच शिक्षणाचा ध्यास धेतलेल्या कर्मवीर अण्णांचंी, शाहू महाराजांची ही भूमी, इथल्या शिकलेल्यांना स्त्री-पुरुष समानतेबद्दल काही तरी नक्कीच सांगायचं असणार. ती असल्याबद्दल किंवा नसल्याबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं असणार. पण कोणीही याबाबत लेखणी उचलली नाही. गरज आहे ती ब्राह्मणेतर समाजातील स्त्री-पुरुषांनी पुढे येऊन लेखन करण्याची.
वर्तमानपत्रात, साहित्यात समाजातल्या सर्व जातीधर्मातल्या स्त्री-पुरुषांचे अनुभव व्यक्त होणं जरुरीचं आहे. त्यामुळे मराठी समाजजीवन समृद्ध होईल. साहित्य समृद्ध होईल. त्यामुळे माणूस म्हणून एकमेकांना समजून घेताना अशा लिखाणाची मदत होईल. आपल्या शेजाऱ्याची काय भाषा आहे, तो आपल्या पत्नीशी वा मुलीशी कसा वागतो हे त्या समाजाचा भाग असणाऱ्यांना ठाऊक असायला नको का?
एकीकडे ब्राह्मणांच्या सांस्कृतिक मक्तेदारीबद्दल गळा काढायचा किंवा फाडायचा. आणि दुसरीकडे परिस्थिती अशी की टिचभर मजकूर लिहितानाही हात कापणार असेल किंवा जर अवघडलेपण येणार असेल तर नक्कीच काही तरी सॉलिड हुकलेलं आहे. महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी फक्त ब्राह्मण स्त्रियांना शिक्षण मिळावं आणि त्याद्वारे समानता मिळावी, म्हणून निश्चितच शिक्षणाची दारं उघडी केली नाहीत. शाहू महाराज, कर्मवीर अण्णा, महर्षी शिंदे, ताराबाई शिंदे आणि यशवंतराव चव्हाणदेखील ब्राह्मणांना `वाचा' मिळावी म्हणून शिक्षणाचा प्रसार करत नव्हते. आजही माळी किंवा मराठा समाजातील स्त्रिया मोठ्या प्रमाणावर शिकल्या नसतील किंवा शिकत नसतील किंवा शिकूनही त्यांना बोलण्याचं, आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नसेल तर सावित्रीबाइंर्च्या या लेकींनी आता शंभर वर्षांनंतर का होईर्ना, पण याचा जाब संबंधितांना विचारायला हरकत नाही. जाब नसेल विचारायचा तर निदान वस्तुस्थिती तरी समाजापुढे मांडली पाहिजे. शक्य झाल्यास त्याची कारणमीमांसा केली पाहिजे.
मी ही प्रतिक्रिया थोडक्यात पत्ररुपाने चतुरंग पुरवणीतच मांडलेली होती. पण या विषयावर वाद संवाद झडणं जरुरीचं आहे. विशेषत: ब्राह्मणेतर समाजातल्या शिकलेल्या स्त्रियांनी बोलायला हवं.
ब्राह्मण समाजातील लोकांपेक्षा अन्य जातीधर्मातील लोकांची-विशेषत: स्त्रियांची काय प्रतिक्रिया आहे, ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. लोकसत्ताचं आवाहन हे पुरुषांनाही होतं. तेव्हा त्यांनीही याबाबत गंभीरपणे भूमिका मांडायला हरकत नाही.


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
स
तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. इतर जातीय महिला आणि पुरूषांनीही आता व्यक्त झालं पाहिजे. तरच त्यांच्यात काय चाललंय ते कळून येईल.