ममता महादेव पार्वती परब
वय-१३, कुडाळ हायस्कूल - कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग
आज खरंच शाळेत काय काय घडलं? ते आठवतेय, का? अहो
- सुनीताताइंर्नी सांगितलं - जे जे वाटतं तसा लिहायचा प्रयत्न कर -
कसा वाटला आजचा अनुभव? काय शिकायला मिळालं? तुला जे
वाटतं ते तुझ्या शब्दांत मांड. तुझा अनुभव अभियानात खूप जणांना
प्रेरणा देईल.
खरंच असं काय ग्रेट केलं मी माहीत नाही, पण जे समजलं,
उमजलं ते नक्कीच ग्रेट होतं. मला एका भ्रमातून, गैरसमजातून बाहेर
पाडणारं होतं.
काय झालं माहीत आहे- दुपारची जेवणाची सुट्टी संपली. वर्गात
पुढच्या तासाच्या सरांची वाट पाहात होतो. सर आलेच पण सरांसोबत
सुनीताताई आल्या.
खरं तर सरांनी आज विषयाचा तास न घेता या मॅडम तुमच्याशी
बोलतील असं सांगितलं. आमच्या सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
पण सुनीताताइंर्नी स्वत:ची ओळख करून दिली. आमचे चेहरे पाहूनच
आमच्या मनातलं जणू ओळखलं.
मी व्याख्यान देऊ की गप्पा मारू या? असा प्रश्न विचारला.
अर्थातच आमचं उत्तर होतं गप्पा मारायच्या. मग काय? गप्पांना
सुरुवात झाली. `शक्य आहे' अभियानाबद्दल त्या बोलणार,
म्हणाल्या- प्रश्न आला - कोणाला असं वाटतं की आपल्या घरात
स्त्री-पुरुष समानता आहे?
मुलं जरा हट्टीपणानेच घरात समानताच आहे या मुद्द्यावर आग्रही
होती.
आम्हा मुलींच्या प्रतिक्रिया हो-नाही अशा दोन्ही होत्या. आलेल्या
प्रत्येकीच्या मुद्द्यावर चर्चा होत होती. चांगल्या अनुभवाचं कौतुक
करत असतानाच त्यातील बारकावे समोर येत होते.
पण तरीही मुलांचे आग्रही मत की आमच्या घरात असमानता
नाहीच. मग सुनीताताईने प्रश्न विचारला -
आता सांगा बरं - आपल्या आई-वहिनी-ताइंर्पैकी कुणाचं
लग्नानंतर आडनाव बदललं नाही.
मग मात्र मुलांमध्ये शांतता पसरली पण यावेळी घरात समानता
आहेच ह्या आग्रही मतामध्ये मी होतेच. यावेळी पण मी संागितलं -
माझ्या आईचं आडनाव बदललेलं नाही.
मी गावातली - इतर कुटुंबातलंच वातावरण माझ्या घरात. मग
हे असं आहे म्हटल्यावर ताइंर्नी पहिल्यांदा कौतुक केलं. पण म्हणाल्या,
मला आणखीही बोलायचंय. आपण सगळयांसाठीच हे उदा. समजून
घेऊ या.
मला विचारलं - आईचं माहेरचं नाव काय?
उत्तर दिलं - पार्वती दत्तात्रेय परब.
लग्न झाल्यावरचं आईचं नाव - पार्वती महादेव परब
उत्तर दिलं - प्रश्नाच्या खोलात गेल्यावर समोर आलेले मुद्दे -
माहेरचं आणि सासरचंही आडनावही परबच असल्याने आडनाव
तेच राहिलं.
मूळ नाव बदललेलं नव्हतं पण नावाच्या नंतर माहेरी वडिलांचं
नाव असलेल्या जागी नवऱ्याचं नाव लावलं होतं.
हे सगळं अगदी मला नीट समजलं - आणि मला त्याच क्षणी
वाटलं -
आपल्यासाठी एवढं करणाऱ्या - खस्ता खाणाऱ्या आईचं नाव
कायदा होऊनही आपण फक्त बाबांचंच नाव का लावायचं?
मी विचार करत होते. सुनीताताइंर्नी मला भानावर आणलं. कळलं
का काय गोंधळ होत होता ते?
मी म्हटले हो तर-
आणि मी माझा `चेंज मेकर'चा फॉर्म भरला. फॉर्मवर मी माझं
नाव लिहिलं. हेच नाव माझं लग्न झाल्यावरही तसंच ठेवणार आहे. ते
नाव म्हणजे ममता महादेव पार्वती परब.
आता ती माझ्या अनुभवाबद्दल सगळयांना सांगणार आहे.
आजचा दिवस माझा खूप छान गेला खूप काही समजलं आणि खूप
आनंदात गेलेला दिवस म्हणून माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील.
थॅंक्यू`शक्य आहे' अभियान !
एक अनामिका (कोकण विभाग)
``कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा - २००५'' कार्यशाळेचंनिमंत्रण. विषय वाचूनच उत्सुकता वाढली. कधी एकदा कार्यक्रमात
पोहोचते असं झालं आणि फक्त कायद्याच्या पेक्षाही बरंच काही
महत्त्वाचं असं यामुळे कळलं.
मुख्य म्हणजे `शक्य आहे- महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा
अंत' या अभियानाबद्दल माहिती मिळाली. साध्या साध्या गोष्टींसंदर्भात
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारी हिंसा म्हणजे काय? ते समजलं.
हे सगळं प्रत्यक्ष कार्यक्रमात समजून घेत असतानाच घरात
माहेरी-सासरी-समाजात आणि अगदी नोकरीच्या ठिकाणीही होणारी
हिंसा भेदभावाचे मुद्दे नजरेसमोर एखाद्या चित्रपटासारखे यायला लागले.
मी स्वत: लग्नाला साडेतीन वर्षं झालेली, सतत भांडण, घरगुती
वाद कधी कामावरून तर कधी सोन्याच्या दागदागिन्यांवरून तर कधी
अविेशासामुळे सतत भांडण - यातच प्रत्यक्ष मारहाणीची भर पडली,
सगळं सहन करण्याच्याही पलीकडे गेलं तरीही मी शांतच. हे सगळं
कुणाजवळ आणि का बोलायचं? आज नाही तर उद्या सुखाची पहाट
उगवेल. हे सगळं थांबेल. पण दोघांमधली विेशासाची दरी आणि
सोबत मारहाणही वाढतच होती.
माझ्या मनात रूढी-परंपरांमुळे काही ठाम विचार पक्के होते.
``पावसानं झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं तर कुणाला सांगायचं?''
नवरा -बायको मधली खाजगी बाब नातेवाईक-मित्र-मैत्रिणींना सांगून
आपलीच प्रतिष्ठा-इज्जत कशी घालवायची?
या सगळयानुसार आपण आपलं शांत राहून सहन करावं हे बरं,
पण...
`शक्य आहे' अभियानाच्या कार्यशाळेला गेले आणि माझ्या या
समजुतीलाच तडे गेले. हॉलमध्ये गेल्यावर ज्या घोषणा, संदेश, पोस्टर
बघितले आणि मी जणू झोपेतूनच जागी झाले.
हॉलमधले बॅनर होते.
मौन सोडा- हिंसेविरुद्ध बोला-
नवरा-बायकोमधील भांडण-मारहाण ही एक खाजगी बाब नसून
सामाजिक घटना आहे.
या मुद्द्यावरची स्पष्टता प्रस्तावनेत सुनीताताइंर्नी केली. अर्चना
ताइंर्नी डीव्ही अक्ट २००५ची माहिती दिली. कार्यशाळा संपली.
माझ्या सोबतीची मैत्रीण तीही अशा अनेक त्रासाने, हिंसेने ग्रासलेली.
आमच्या दोघींच्याही डोक्यात सुरू झाले विचारांचे वादळ. निर्माण
झाले काही प्रश्न आणि त्याच प्रश्नांची मिळालेली उत्तरंही.
मला एवढा शारीरिक-मानसिक-आर्थिक त्रास होतोय. ही म्हणजे
हिंसाच आहे हे कळलंय. मग मी इतके दिवस गप्प का? माझ्यावरच्या
अन्यायाला वाचाही फुटलीच पाहिजे. कोण यावर बोलणार?
अर्थात यावर बोलायला मीच सुरुवात करायला हवी. आज मी
नाही बोलले तर उद्या माझ्या जीवावर बेतेल, याची जाणीव झाली.
मला एक नवीनच दिशा मिळाली.
आजपर्यंत मी हे सगळं सहनही का केलं? असाही प्रश्न सारखा
पडत होता. प्रवासातच काही गोष्टी निश्चित केल्या. आता या
अन्यायाविरुद्ध बोलायलाच हवं. गावी पोहोचले आणि भावाला फोन
करून मनातले विचार कळवले - तोही एकदम आश्चर्यचकित झाला.
नेहमी सगळं सहन करणारी, कोर्ट कचेरीचं नावही न काढणारी बहीण
आज अचानक कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक - कायद्याबद्दल कशी
काय बोलायला लागली, मी त्याला कार्यशाळेबद्दलही सांगितलं.
एकाच कार्यशाळेने माझ्यामध्ये इतका आमूलाग्र बदल झाला
अभियानात सक्रिय राहिले तर माझ्या आयुष्यात नक्कीच चांगले दिवस
येतील. हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला.
आता जेथे जाईन तेथे तेथे अभियानाबद्दल बोलते आहे. आमच्या
मैत्रिणींमध्ये एकमेकींना ताकद देण्यासाठीही `शक्य आहे' अभियान
हे एक माध्यम बनले आहे.
छोट्या छोट्या बदलाच्या कृती परिस्थिती बदलवू शकतात हा
विश्वास मला `शक्य आहे' अभियानानेच दिला आहे.
सौरभ मिरगल
वय- १४, शिक्षण १० वी,
शिक्षक प्रसारक मंडळी इंग्रजी माध्यमाची शाळा, परशुराम
आजच्या आमच्या घरातला प्रसंग - आमच्या कामवाल्या
मावशींना मी म्हटलं, `मावशी, प्लीज मला पाणी द्याल?' आणि
आई बघतच राहिली.
सतत मला हे हवं ते हवं असं विनंती न करता हक्कानं मागणारा
अधिकार गाजवणारा मी चक्क घरातल्या कामवाल्या मावशींना प्लीज
म्हणालो म्हटल्यावर आई जरा चमकलीच.
मी काही मुद्दाम हक्क गाजवतो - अधिकार गाजवतो असं नाही
एक तो सवयीचाच भाग झाल्यासारखाच होता की आपल्याला वेळेवर
काही गोष्टी मिळायलाच हव्यात.
साध्या साध्या बाबींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्याही
महत्त्वाच्या असतात. आपण एखाद्या बाईशी, मुलीशी बोलताना कशी
भाषा वापरतो. त्यावर त्या बाईचा सन्मान ठरत असतो. मी विचारात
पडलो म्हटलं `चेंज मेकर'चा फॉर्म भरलाय तर काही तरी चांगली
सुरुवात व्हायलाच हवी. ती सुरुवात मी केली. आमच्या कामवाल्या
मावशींना सन्मान देऊन. पण माझ्या त्या प्लीजचा अर्थ मावशींना
कळला नाही की कळला माहीत नाही. पण मला वाटतं माझ्या
बदललेल्या टोनमुळे त्यांना फरक नक्कीच जाणवला असणार. त्यांची
प्रेमळ नजर मला ते सांगून गेली. खरं सांगू तो दिवस मला खूप छान
वाटला. ती सकाळ खूप छान वाटली. मला शब्दात नाही सांगता
येत, पण मला वाटतं मला काय म्हणायचंय ते तुम्हाला कळलंय होय
ना?
Posted in



无标题文档two watches that lasted