अणुवीजनिर्मितीबाबतची अवास्तव भाकिते
भारताच्या अणुऊर्जा खातेप्रमुखांनी स्थापनेपासून अणुऊर्जा-वीजेसंबंधी अनेक शंका व्यक्त केल्या आहेत. १९६२ साली त्यांचे भाकित होते की १९८७ पर्यंत २० ते २५ हजार मे. वॅट वीज उत्पादन होईल. १९६९ साली त्यांचे भाकित होते की सन २००० पर्यंत ४३,५०० मे. वॅट वीजनिर्मिती होईल. पण प्रत्यक्षात २००० पर्यंत फक्त २७२० मे. वॅ. वीजनिर्मिती झाली. आणि आज २००७ अखेरपर्यंत अणुवीजनिर्मितिक्षमता ४१०० मे. वॅट म्हणजे एकूण वीजनिर्मितीक्षमतेच्या फक्त ३% इतकीच आहे.
अणुऊर्जा खात्याच्या अशा सततच्या अपयशाला आर्थिक कमतरता हे कारण नाही. सर्वच केंद्र सरकारांनी अणुऊर्जेला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे अणुऊर्जा खात्याची आर्थिक तरतूद नेहमीच भरपूर राहिलेली आहे. १९९८ साली केलेल्या अण्वस्त्र चाचण्यांंनंतर हे झुकते माप अधिकच वाढले आहे. अणुऊर्जा खात्याची १९९७-९८ मध्ये तरतूद १८.४ अब्ज रुपये होती. ती वाढून २००६-२००७ मध्ये ५०.३ अब्ज रुपये झाली. म्हणजेच रुपयाचे वास्तव मूल्य धरले तरी दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. याच्या तुलनेत १०४०० मे. वॅट वीजनिर्मितिक्षमता निर्माण केलेल्या पुनर्निर्माणक्षम ऊर्जा मंत्रालयाची (ठशपशुरलश्रश एपशीसू चळपळीींीू) २००६-२००७ची आर्थिक तरतूद ३.८७ अब्ज एवढीच आहे.
अणुवीज स्वस्त असल्याचा फसवा दावा
अणुऊर्जा खात्याचे ठाम प्रतिपादन आहे की अणुवीज पुरवठ्यातील केवळ महत्त्वाचा हिस्सा असेल असे नाही तर अणुवीज स्वस्तही असेल. परंतु हा दावाही विश्लेषणाच्या कसोटीवर टिकत नाही. खनिज कोळसा किंवा गॅस आधारित वीज केंद्रापेक्षा त्याच क्षमतेच्या अणुऊर्जा वीज प्रकल्पांच्या उभारणीचा खर्च खूपच जास्त असतो. आयात केलेली अणुभट्टी (र्पीलश्रशरी ीशरलींेी) तर आणखीच महाग पडणार. यामुळे अणुवीजेचा इंधन खर्च कमी असला तरी एकूण खर्च लक्षात घेतला तर औष्णिक विजेपेक्षा अणुवीज महाग पडते. हे केवळ भारतात नव्हे तर इतर देशांबाबतही खरे आहे.
अणुभट्टीचे आयुष्य संपले की ती बंद करावी लागते. (वशलेााळीीळेपळपस) त्यावेळी अणुभट्टीतील सर्व किरणोत्सर्गी द्रव्ये व वस्तू ह्यांच्यापासून किरणोत्साराची बाणा होणार नाही अशी व्यवस्था करावी लागते. हे काम दीर्घकाळ म्हणजे अनेक दशके टप्प्याटप्प्याने करावे लागते. कारण अति किरणोत्सारी घटकांचा क्षय किंवा विघटन होण्यास पुरेसा अवधी उपलब्ध असावा लागतो. अणुभट्टी बंद करण्याचा आजवरचा अनुभव तसा मर्यादित आहे. त्यामुळे अणुभट्टी बंद करण्यास अपेक्षित खर्चापेक्षा जास्त खर्च येतो. हा खर्च धरला तर अणुवीज अधिकच महाग पडते.
अणुवीज केंद्र उभारणीचा खर्च कमी करता येत नाही याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सुरक्षिततेसाठी करावा लागणारा खर्च. वीजनिर्मिती तंत्रांमध्ये अणुऊर्जा वीज तंत्रज्ञान हे एकमेव असे आहे की ज्यामध्ये महासंकटकारी अपघाताची शक्यता असते. उदा. १९८६ सालचा चेर्नोबिलचा अपघात. चेर्नोबिलनंतर अणुभट्टीच्या सुरक्षिततेत सुधारणा झाल्या असल्या तरी अणुभट्टीच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे अणुभट्टी नेहमीच अपघातप्रवण राहते. कारण त्यातील अत्यंत जटिल परस्परक्रियांवर आधारित यंत्रणा आणि एकमेकांशी घट्टपणे जोडलेले भाग या गोष्टी अपरिवर्तितच राहतात. अणुभट्टीच्या या विशिष्ट स्वरूपामुळे हरतऱ्हेच्या अपघातांच्या सर्व शक्यतांचा विचार करून नियोजन करणे अवघड असते. शिवाय एखादी लहान अनपेक्षित घटना झपाट्याने नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. या सर्व कारणांमुळे अणुभट्टीतील मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
भारतातील जवळजवळ सर्व अणुभट्ट्यांमध्ये किंवा आण्विक इंधनाशी निगडित इतर साधनसुविधांमध्ये कमी अधिक तीव्रतेचे अपघात झालेले आहेत. अशा तऱ्हेच्या लहान अपघाताचे पर्यवसान मोठ्या अपघातात होऊ शकते. त्यांचा परिणाम विशेषत: आपल्याकडील मोठ्या कृषिक्षेत्राचा विचार करता अनर्थकारी ठरू शकतो.
किरणोत्साराचे दुष्परिणाम
आण्विक इंधन साखळी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर किरणोत्सारी कचरा (आणि इतर विषारी द्रव्ये) निर्माण करते. त्यापैकी काही जीवावरणात (लळेीहिशीश) सोडली जातात. युरेनियम खाणकाम व ते अणुभट्टीत वापरण्यायोग्य बनवणे या कामामध्ये स्थानिक लोकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम झाल्याचे जगभर दिसते. अणुवीज प्रकल्पांच्या जवळपासदेखील आरोग्यावर दुष्परिणाम झालेले आढळतात. उदा. ब्रिटन, क्रॅनडा, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, जपान आणि स्पेनमधील १३६ अणुवीज प्रकल्पांच्या भोवतालच्या लोकांच्या आरोग्यविषयक केलेल्या विश्लेषणातून सिद्ध झाले, की तेथे रक्ताच्या क्रॅन्सरचे प्रमाण वाढलेले
ाहे. भारतात राजस्थानमधील रावतभाटा येथील `राजस्थान अणुवीज केंद्रा'जवळच्या आणि या जागेपासून पन्नास कि.मी. दूरवरच्या खेड्यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे आढळले की प्रकल्पांजवळील खेड्यात इतर आजारांबरोबर जन्मजात व्यंगे, अचानक गर्भपात, मृत बालके जन्मणे आणि एक दिवसाच्या बाळांचे मृत्यू आणि गाठींचे र्(ींीोीी) प्रमाण निर्णायकरित्या वाढलेले दिसते.
घातक किरणोत्सारी कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न
सगळयात मोठा आणि घातक धोका संभवतो तो अणुभट्टीत जाळलेल्या अणुइंधनामुळे. कारण त्यामध्ये अणुकेद्रभंजन साखळी प्रक्रियेत निर्माण झालेल्या किरणोत्साराचा खूप मोठा संचय असतो. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या या किरणोत्सारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दोन पद्धती निरनिराळया देशांत वापरात आहेत. एक, त्यावर पुनर्प्रक्रिया (ीशिेलीशीीळपस) करणे (फ्रान्स, भारत, जपान) किंवा दुसरी म्हणजे त्याची थेट विल्हेवाट लावणे (क्रॅनडा, अमेरिका), विविध प्रकारे केली जाणारी पुनर्प्रक्रिया हा आण्विक इंधन शृंखलेतील सर्वात हानिकारक भाग आहे. ह्यात मोठ्या प्रमाणात किरणोत्सारी घन, द्रव आणि वायू कचरा निर्माण होतो. पुनर्प्रक्रियेत वापरलेल्या आण्विक इंधनातील किरणोत्सारी द्रव्ये तीन प्रवाहात वेगळी केली जातात. निम्न पातळी (श्रेु श्रर्शींशश्र) मध्यम पातळी (ळपींशीाळवळरींश श्रर्शींशश्र) आणि उच्च पातळी (हळसहीं श्रर्शींशश्र) . निम्न पातळीवरील किरणोत्सारी कचरा सरळसरळ जीवावरणात सोडला जातो आणि म्हणून विविध किरणोत्सारी घटकांची बाधा मानव व इतर सजीवांना होते.
किरणोत्सारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दोन्ही पद्धतीत (पुनर्प्रक्रिया व थेट विल्हेवाट) किरणोत्सारी भाग (वापरलेले इंधन व उच्च पातळीचा कचरा) सततच्या देखरेखीखालील जागांवर साठवले जात आहेत. सर्वच देश हा किरणोत्सारी कचरा जमिनीखाली खोलवर सुरक्षित कोठारांमध्ये साठवण्याचा विचार करत आहेत. परंतु प्रत्यक्षात असे एकही कोठार अजून बांधले गेलेले नाही.
आण्विक कचऱ्याचे किरणोत्सारी स्वरूप बदलण्याचा कोणताही मार्ग नसल्याने त्यांच्या संपर्कात आल्यास हा कचरा शेकडो, हजारो वर्षे घातक परिणाम करीत राहणार. किरणोत्साराचा धोका टाळण्यासाठी हा कचरा मानवी संपर्कापासून दूर ठेवून त्यावर सतत नजर ठेवावी लागणार. एखाद्या गोष्टीची अशी काटेकोर काळजी घेतली गेल्याचा एकही दाखला आजवरच्या मानवी इतिहासात सापडत नाही. आपण अणुुवीज केंद्राच्या विजेचा वापर करणार आणि पुढील पिढ्यांना गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार. हा पुढील पिढ्यांबरोबर उघड उघड केलेला अन्याय आहे.
पृथ्वीचे तापमान वाढत आहे. (सश्रेलरश्र ुरीाळपस) व त्या दृष्टीने अणुवीज जास्त पर्यावरणस्नेही आहे असा प्रचार सध्या वाढताना दिसतो आहे. हा युक्तिवाद बिनबुडाचा आहे. आण्विक इंधनाची साखळी प्रक्रिया खनिज इंधनापेक्षा वेगळया तऱ्हेने प्रदूषण करते इतकेच. कदाचित पृथ्वीच्या तापमानवाढीची गंभीर समस्या आपल्याला भेडसावेल म्हणून इतर पर्यावरणीय हानी व पुढील अनेक पिढ्यांवर दुष्परिणाम करणाऱ्या किरणोत्सारी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करता कामा नये.
जलद इंधन-जनक अणुभट्टी (ऋरीीं लीशशवशी ीशरलींेी)
जलद इंधन-जनक अणुभट्टी हे भविष्यातील अणुवीजेचे तंत्रज्ञान असेल असा विचार मांडला जातो; कारण त्यात जेवढ्या भंजनक्षम इंधन-द्रव्यांचा व्यय होतो, त्यापेक्षा अधिक इंधन-द्रव्य उत्पन्न होते. पस्तीस वर्षांच्या प्रयत्नानंतर अणुऊर्जा खात्याला केवळ प्रायोगिक स्वरूपाची अणुभट्टी बनवणे साध्य झाले आहे. शिवाय आजपर्यंतच्या तिच्या कार्यकाळात अनेक समस्यांनी आणि अपघातांनी ती ग्रासलेली आहे.
जलद इंधन-जनक अणुभट्टी सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या दृष्टीने अधिकच प्रश्न उभे करते. या अणुभट्टीत स्फोट होण्याचा धोका असतो. अणुभट्टीत निर्माण झालेली प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी शीतनक (लेेश्ररपीं) म्हणून द्रवरूप सोडियमचा उपयोग करतात; हे द्रव्य हवेच्या संपर्कात आले की ते पेट घेते, त्याची पाण्याबरोबर जबरदस्त रासायनिक विक्रिया घडते. त्यामुळे या अणुभट्ट्यांमध्ये गंभीर स्वरूपाच्या आगी लागण्याचा धोका असतो. तसे झाल्यास अणुभट्टी दीर्घकाळ बंद करावी लागते. या अणुभट्टीत जे प्लुटोनियम आधारित इंधन वापरतात, ते युरेनियम २३५ पेक्षा ३०,००० पट जास्त किरणोत्सारी असते. त्यामुळे मोठा अपघात झाला तर लोकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अधिक भीषण असतील. या सर्व कारणांमुळे त्यांची उभारणी आणि देखभाल दोन्ही अत्यंत खर्चिक होते.
प्लुटोनियमचा वापर म्हटला की इंधनाच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान सुरक्षिततेसाठी अत्यंत खर्चिक दक्षता उपायांची गरज असते. प्लुटोनियम-आधारित इंधन तयार करण्याचा खर्चसुद्धा युरेनियम इंधनाच्या एकूण खर्चापेक्षा अनेकपट अधिक असतो. त्याचबरोबर वापरलेल्या इंधनापासून (ीशिपीं र्षीशश्र) प्लुटोनियम मिळवणे हेही खर्चिक असते. हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर जलद इंधन-जनक अणुभट्टी न परवडणारी, आतबट्ट्याची ठरते. त्यामुळे अनेक देशांनी हे कार्यक्रम रद्द केलेले आहेत यात आश्चर्य नाही.
असा एक युक्तिवाद केला जातो की भारतात या अणुभट्ट्यांची खास गरज आहे. कारण भारतात युरेनियमचे साठे कमी आहेत आणि थोरियम भरपूर प्रमाणात आहे. परंतु हा युक्तिवाद चुकीचा आहे. एखादा स्रोत विपुल प्रमाणात उपलब्ध आहे याचा अर्थ तो किफायतशीर पद्धतीने वापरता येईल असा होत नाही. तसे असते तर आपली विजेची सर्व गरज सौर प्रकाशविद्युतचालक घटांमार्फत (ीेश्ररी र्हिेींेींेश्रींरळल लशश्रश्री) मिळवता आली असती. परंतु सध्या तरी ती अत्यंत महाग आणि न परवडणारी आहे. याप्रमाणेच थोरियमचा वापर करून वीजनिर्मिती शक्य झाली तरी ती अजिबात परवडण्याजोगी नाही.
एम. व्ही. रामण्णाज् सेंटर फॉर इंटरडिस्पिलनरी स्टडीज इन एनव्हायरनमेंट अँड डेव्हलपमेंट, बंगलोर.
Posted in



无标题文档two watches that lasted