कमलाबाईंची साथ - साथ ला लाखमोलाची मदत

ववाहच्या संदर्भात डोळसपणे विचार करायला उद्युक्त करणारी `साथ-साथ' ही संस्था चळवळ स्वरुपात कार्यरत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलताई भागवत यांनी नुकतीच संस्थेला लाखमोलाची देणगी दिली. त्या कार्यक्रमाचा वृत्तान्त...
गेली बारा वर्षं सातत्याने `साथ-साथ' ही संस्था `परिचयोत्तर विवाह' व्हावे आणि जोडीदाराची जाणीवपूर्वक पूर्ण विचार करून निवड व्हावी यासाठी चळवळ स्वरूपात कार्यरत आहे. संस्थेच्या संस्थापक विद्याताई व त्यांचे सहकारी यांच्या तीव्र प्रेरणेमुळे `साथ-साथ' चे काम जोरात सुरू आहे.
समाजात विविध समस्यांवर काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत. मात्र विवाह व त्याच्याशी निगडित प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. घटस्फोटांच्या वाढत्या संख्येवरून विवाहोत्तर समस्या गंभीर होत चालल्याचे निदर्शनास येत आहे.
वेगवेगळया पद्धतीने, विवाहविषयक विविध प्रश्नांना सामोरे जात, अनेक पातळयांवर काम करणारी `साथ-साथ'ची संकल्पना कमलताई भागवतांना मनापासून पटली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक के. पी. भागवत यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यसैनिक कमलाताई भागवत यांनी रु. एक लाखाची देणगी डॉ. विठ्ठल प्रभंूच्या हस्ते देऊन `साथ - साथ' च्या कार्याचा गौरव केला. मात्र कमलताई व `साथ-साथ' यांना जोडणारा दुवा म्हणजे गोपाळराव पटवर्धन. एखाद्या सामाजिक संस्थेची भूमिका पटणे म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्या कार्यात सहभागी होणंच असतं. कमलताइंर्ची देणगी देण्याची इच्छा व `विवाह' बाबत महत्त्वपूर्ण कार्य करणारी `साथ-साथ' संस्था यांचा सुंदर मिलाफ गोपाळरावांनी घडवून आणला. योग्य दिशेने चालू असलेली वाटचाल आणि कमलताइंर्कडून मिळालेला `अर्थपूर्ण' पाठिंबा यामुळे `साथ-साथ' च्या कार्यकर्त्यांची काम करण्याची उमेद निश्चितच वाढली आहे.
वयाची नव्वदी पार केलेल्या कमलताई भागवत `देणगीप्रदान' समारंभासाठी आवर्जून आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात `साथ-साथ' विषयीच्या `स्लाईड-शो'ने झाली. प्रमुख पाहुणे डॉ. विठ्ठल प्रभू यांची ओळख `साथ-साथच्या' मुख्य कार्यकर्त्या वंदना कुलकर्णी यांनी करून दिली. मान्यवरांचे सत्कार उज्ज्वलाताई व विद्याताई यांच्या हस्ते झाले.
कमलताइंर्नी आपल्या भाषणात त्यांच्या सहजीवनाचे अनुभव आणि त्या काळात केलेला नोंदणी पद्धतीचा प्रेमविवाह यांचा केलेला उल्लेख सर्वंाना प्रेरणादायी वाटला. आयुष्यातील मोठ्या टप्प्यातील तपशील कमलताइंर्ना सर्व संदर्भ व सालासहित आठवत होते हे विशेष. `साथ-साथ' ची आजची विचारप्रणाली त्या काळात खऱ्या अर्थाने जगणारे भागवत दांपत्य हे तेव्हाचे द्रष्टे कार्यकर्तेच होते. के. पी. भागवतांविषयी बोलताना कमलताई म्हणाल्या,
भागवतांनी वयाच्या ३३ व्या वर्षी १९४५ साली `वैवाहिक जीवन' या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यात शेवटचे प्रकरण `विवाह सल्ला केंद्र' असे आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर ६२ वर्षांनी अशा तऱ्हेच्या केंद्राला भागवतांच्या नावाने देणगी देण्याचा आनंददायी योग आला आहे. देणगी योग्य संस्थेला देत आहोत याचं मनोमन समाधान कमलताइंर्ना होतंच; पण ती देणगी समर्थ हस्ते दिली जावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच `विवाह व कामजीवन' या विषयावर गेली अनेक वर्षं लेखन व समुपदेशन करणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या हस्ते `साथ-साथ' च्या वतीने विद्याताइंर्नी ही देणगी स्वीकारली.
`काम-जीवना' बद्दलचे समज-गैरसमज या विषयी केलेल्या सखोल चिंतनातून डॉ. विठ्ठल प्रभू यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. नवविवाहित दांपत्याला नवी दृष्टी देणारे विचार त्यांनी मांडले - ``प्रेम सहवासातून निर्माण होतं, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. लग्नानंतर काम-जीवनही शिकावं लागतं, याचं भान दोघांनीही ठेवायला हवं. हायपोथॅलॅमस हे केंद्र लैंगिक भावनांविषयी कार्य करते. किशोरावस्थेतून तारुण्यावस्थेत पदार्पण करताना इंद्रियांची वाढ होत असते व शरीरात रासायनिक बदलही होत असतात. तरुण-तरुणी या काळातील आकर्षणालाच प्रेम समजतात आणि विवाहबंधनात अडकण्याची घाई केली जाते. काही वर्षांनंतर दोघांना एकमेकांतील उणिवा तीव्रपणे जाणवू लागतात आणि मग हळूहळू सुरू झालेले ताण-तणाव घटस्फोटापर्यंत जातात. वाढते घटस्फोट, स्त्री-पुरुषांतील नैसर्गिक भेद, एकमेकांचा काम प्रतिसाद, नपुंसकत्व याविषयींची शास्त्रीय कारणमीमांसाही त्यांनी समजावून सांगितली.
गोपाळराव पटवर्धन यांनी सांगितले की, लग्न म्हणजे अनेक तडजोडींची मालिकाच असते. पण ह्या तडजोडी म्हणजे काय आणि कोणत्या हेच मुला-मुलींना समजत नाही.
तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे `साथ-साथ' साठी हा कार्यक्रम देणगीइतकाच महत्त्वाचा ठरला. श्री. गणेश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन `साथसाथ'च्या सेक्रेटरी लीना कुलकर्णी यांनी केले.
-स्वाती घोटीकर, पुणे

Hiphop, Rap, Türkçe rap